आरोग्य

जास्त प्रमाणात पाणी पिणंही ठरू शकतं घातक, जाणून घ्या किती पाणी पिणं शरीरासाठी योग्य

पाणी शरीरासाठी किती गरजेचं असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. पाण्याचं मदतीनं शरीरातील वेगवेगळी कामं करण्यास मदत मिळते. पाण्यानं शरीर हायड्रेट राहतं आणि अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव होतो. एक्सपर्ट दिवसभर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. मात्र, प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतं. जास्त पाणी प्यायल्यास ओवरहायड्रेशनची समस्या होते. ज्याला वॉटर इंटाक्सिकेशन असंही म्हणतात. जास्त पाणी प्यायल्यास किडनीवर दबाव पडतो आणि अनेक प्रकारच्या समस्या होतात.

पाणी पिण्याची योग्य पद्धत…

पाणी नेहमीच योग्य पद्धतीनं प्यायला हवं. पाणी कधीच घाईघाईनं पिऊ नये. पाणी हळूहळू एक एक घोट प्यावं. जेणेकरून ते शरीरात ते अब्जॉर्ब व्हावं. खूप जास्त थंड किंवा गरम पाणी कधीच पिऊ नये. पाणी जेवण झाल्यावर नेहमी अर्ध्या तासांनंतर प्यावं. जेणेकरून पचनक्रिया चांगली व्हावी. जेवण केल्यावर लगेच पाणी प्यायल्यास पचनक्रिया स्लो होते. सकाळी उपाशीपोटी पाणी पिणं फायदेशीर असतं. असं केल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.

पाणी पिण्याचं योग्य प्रमाण…

सामान्यपणे एका हेल्दी व्यक्तीनं दिवसातून ८ ते १० ग्लास म्हणजे साधारण २ ते अडीच लीटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण हे प्रमाण तुमचं वय, वजन लिंग, फिजिकल अ‍ॅक्टिविटी आणि वातावरणावरही अवलंबून असतं. तुम्ही जास्त एक्सरसाईज करत असाल आणि तुमचा जास्त घाम जात असेल तर पाणी पिण्याचं प्रमाण वाढेल. जर तुम्ही आजारी असाल आणि औषधांचं सेवन करत असाल तर पाण्यात प्रमाणात बदल होऊ शकतो.

काय काळजी घ्याल…

रोज तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पित आहात याची काळजी घ्या. पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणं टाळलं पाहिजे. कारण यानं शरीरात सोडिअमचं संतुलन बिघडतं, ज्यामुळे हायपोनेट्रेमियाचा धोका वाढतो. पाण्याचं प्रमाणं प्रमाणा तुमच्या शरीराच्या गरजांनुसार बदलू शकतं. पण एकूणच काय तर दिवसभर भरपूर पाणी प्यावं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

2 तास ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

17 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

22 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

22 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

22 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

22 तास ago