आरोग्य

जेवणाआधी पाणी प्यायलं की वजन वाढत नाही

पाणी आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण आधार आहे. शरीराला योग्य प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी प्यायलात नाही तर तब्येतीवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे शरीरात वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात. जेवताना पाणी पिण्यापेक्षा जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा २० मिनिटांनी पाणी प्यायला हवं. वजन कमी करण्यासाठी तुम्ही कसं पाणी पिता, किती पिता हे फार महत्वाचं असतं.

जेवणाआधी २ तास २ ग्लास पाणी प्यायल्यानं वजन नियंत्रणात राहतं आणि जास्त खाण्यापासून सुटका मिळते. लठ्ठपणा आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. आहारतज्ज्ञ शिवाली गुप्ता यांनी जेवणाआधी पाणी पिणं आणि लठ्ठपणा कंट्रोल करण्याबाबत अधिक माहिती दिली आहे.

जेवणाच्या आधी पाणी पिण्याचे फायदे

जेवणाआधी पाणी प्यायल्यानं पोट भरल्यासारखं वाटतं. ज्यामुळे तुम्ही कमी प्रमाणात जेवता. यामुळे कॅलरीजचे सेवन नियंत्रणात राहते आणि वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगानं होते. पाणी पचनक्रिया सक्रिय करते आणि जेवण पचणं सोपं होतं. शरीरातील फॅट आणि शुगर अवशोषण नियंत्रणात राहते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. जेवणाच्या आधी पाणी प्यायल्यानं सोडा, ज्यूस अन्य कॅलरीज युक्त ड्रिंक्सचे सेवन कमी करता येते. यामुळे वजन वाढण्यापासून रोखता येतं.

पाणी प्यायल्यानं शरीरातील मेटाबॉलिझ्म वेगानं वाढतो. एक्सपर्ट्स सांगतात की जेवणाच्या आधी ५०० मिलीलीटर पाणी प्यायल्यानं मेटाबॉलिझ्म २४ ते ३० टक्के वाढतो ज्यामुळे कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघण्यास मदत होते.

जेवणाआधी पाणी पिण्याची योग्य पद्धत

जेवणाच्या २०-३० मिनिटं आधी १ ग्लास पाणी प्यायल्यानं पोट जेवणासाठी तयार राहते. हलकं कोमट पाणी प्यायल्यास अधिक फायदे मिळतात कारण यामुळे पचनक्रिया एक्टिव्ह राहते. गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यानं त्रास वाढू शकतो. जेवताना सतत पाणी प्यायल्यानं अन्न व्यवस्थित जात नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

12 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

12 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

12 तास ago

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

20 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

20 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

21 तास ago