आरोग्य

हिवाळ्यात ‘हे’ पदार्थ खा, सर्दी पासून होईल सुटका

हिवाळा आला की थंडीने हातपाय गोठून जातात. काहीवेळा लोकांना थंडीमुळे सर्दी होते. सध्या कोरोनाचा प्रादुर्भावदेखील वाढतो आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यायला हवी. हिवाळ्यात काही खाद्यपदार्थांचा समावेश करून थंडीपासून सुटका करता येऊ शकते.

गूळ: गूळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच हिवाळ्यात गूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. गुळामुळे शरीरात उष्णता निर्माण व्हायला मदत होते.

सुका मेवा: हिवाळ्यात बदाम, बेदाणे, अंजीर यासोबतच सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स खावेत. या सर्व ड्रायफ्रुट्समध्ये भरपूर प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे हिवाळ्यात त्यांचे सेवन करणे आवश्यक आहे.

तूप: हिवाळ्यात तूप खाणे खूप फायदेशीर आहे. तुपात आढळणारे हेल्दी फॅट हिवाळ्यात तुमचे शरीर उबदार ठेवतात, ज्यामुळे थंडीपासून आराम मिळतो. याशिवाय हिवाळ्यात तूप खाल्ल्याने त्वचेला ओलावा येतो.

हळद: हळद हे अनेक किरकोळ आजारांवरचे पहिले औषध आहे. जे सर्दी आणि विषाणूपासून आपले संरक्षण करण्यात खूप उपयुक्त ठरते. हिवाळ्यात कोमट दुधात हळद रोज प्यावी.

कांदा: हिवाळ्यात कांदा आपल्या शरीराला ऊब देतो. कांद्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. म्हणूनच हिवाळ्यात कच्च्या कांद्याचे पराठे आणि कांदा कचोरी खाऊ शकता.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेला उद्घाटन; प्रवास ३० मिनिटांनी जलद, टोलवाढ नाही

मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…

5 तास ago

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

9 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

9 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

9 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

9 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

12 तास ago