व्यस्त जीवनशैली आणि अनियमित खाण्यामुळे अनेक आजारांचा विळखा घट्ट होत आहे, या आजारांपैकी एक म्हणजे मधुमेह. आपल्याला अनेक ठिकाणी मधुमेहाचे रुग्ण नक्कीच मिळतील, बहुतेक लोकांचा असा समाज आहे की, मधुमेह जास्त साखर खाल्ल्याने होतो, म्हणूनच तुम्ही ऐकले असेल की लोक म्हणतात की जास्त गोड खाऊ नका, परंतु हे सत्य नाही. कारण गोड खाण्यामुळे मधुमेह हा आजार होत नाही, मधुमेहात डॉक्टर गोड खाण्याची शिफारस करत नाहीत.
ज्या लोकांच्या रक्तात सामान्य साखर असते ते गोड खाऊ शकतात. गोड आणि मधुमेह याच्यामध्ये काही संबंध नाही. मधुमेहाचे बरेच रुग्ण असे आहेत की जे गोड खात नाहीत आणि असेही काही आहेत ज्यांना गोड अजिबात आवडत नाही पण याशिवाय तरीही, ते मधुमेहाच्या समस्येने त्रस्त आहेत. खरं तर मधुमेहाचे मुख्य कारण म्हणजे इंसुलिनचे कमी असणे, गोड खाण्याचा येते काही अर्थ नाही. मधुमेह रूग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याने मिठाई खाऊ शकतात.
मग मधुमेह होण्याची खरी कारण काय
झोप: ज्या लोकांना पुरेशी झोप येत नाही त्यांना मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते काहीवेळा झोपेची कमी असणे सामान्य आहे, परंतु जर तुम्हाला वेळेवर किंवा गाढ झोप येत नसेल तर तुम्ही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे कारण अशा लोकांना मधुमेहाचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते.
लठ्ठपणा: आपल्या शरीराच्या वजनावर जर आपण नियंत्रण असेल तर आपण मधुमेहाची समस्या टाळू शकतो.
तणाव: जर एखादा व्यक्ती सतत ताणतणावाखाली असेल तर साखरेची पातळी वाढते.
बैठेकाम: जे लोक दिवसभर कार्यालयात खुर्चीवर बसून काम करतात त्यांना मधुमेह होण्याची शक्यता 80% पर्यंत वाढते.
व्यायामाचा अभाव: दिवसभरात किमान २० मिनिटे तरी व्यायाम करणे अनिवार्य आहे. ज्यांच्या दिनचर्येत व्यायामाचा अभाव असतो त्यांना मधुमेह होण्याची शक्यता बळावते.
(सोशल मीडियावरून साभार)
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …