व्यस्त जीवनशैली आणि अनियमित खाण्यामुळे अनेक आजारांचा विळखा घट्ट होत आहे, या आजारांपैकी एक म्हणजे मधुमेह. आपल्याला अनेक ठिकाणी मधुमेहाचे रुग्ण नक्कीच मिळतील, बहुतेक लोकांचा असा समाज आहे की, मधुमेह जास्त साखर खाल्ल्याने होतो, म्हणूनच तुम्ही ऐकले असेल की लोक म्हणतात की जास्त गोड खाऊ नका, परंतु हे सत्य नाही. कारण गोड खाण्यामुळे मधुमेह हा आजार होत नाही, मधुमेहात डॉक्टर गोड खाण्याची शिफारस करत नाहीत.
ज्या लोकांच्या रक्तात सामान्य साखर असते ते गोड खाऊ शकतात. गोड आणि मधुमेह याच्यामध्ये काही संबंध नाही. मधुमेहाचे बरेच रुग्ण असे आहेत की जे गोड खात नाहीत आणि असेही काही आहेत ज्यांना गोड अजिबात आवडत नाही पण याशिवाय तरीही, ते मधुमेहाच्या समस्येने त्रस्त आहेत. खरं तर मधुमेहाचे मुख्य कारण म्हणजे इंसुलिनचे कमी असणे, गोड खाण्याचा येते काही अर्थ नाही. मधुमेह रूग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याने मिठाई खाऊ शकतात.
मग मधुमेह होण्याची खरी कारण काय
झोप: ज्या लोकांना पुरेशी झोप येत नाही त्यांना मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते काहीवेळा झोपेची कमी असणे सामान्य आहे, परंतु जर तुम्हाला वेळेवर किंवा गाढ झोप येत नसेल तर तुम्ही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे कारण अशा लोकांना मधुमेहाचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते.
लठ्ठपणा: आपल्या शरीराच्या वजनावर जर आपण नियंत्रण असेल तर आपण मधुमेहाची समस्या टाळू शकतो.
तणाव: जर एखादा व्यक्ती सतत ताणतणावाखाली असेल तर साखरेची पातळी वाढते.
बैठेकाम: जे लोक दिवसभर कार्यालयात खुर्चीवर बसून काम करतात त्यांना मधुमेह होण्याची शक्यता 80% पर्यंत वाढते.
व्यायामाचा अभाव: दिवसभरात किमान २० मिनिटे तरी व्यायाम करणे अनिवार्य आहे. ज्यांच्या दिनचर्येत व्यायामाचा अभाव असतो त्यांना मधुमेह होण्याची शक्यता बळावते.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…
मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…
गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…
मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…
मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…
प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…