आरोग्य

हाय कोलेस्टेरॉल आणि हृदयविकाराचा झटका वेळीच येण्यापासून रोखणारी कारणे

1) आपण जेव्हा मॉर्निंग वॉकला जातो तेव्हा आपल्या पायांवर ताण येऊ ते दुखू लागतात. जर हे वारंवार होत असेल तर पेरिफेरल आर्टरी डिसीजचे लक्षण असू शकते. हा आजार तेव्हा होतो जेव्हा कोलेस्टेरॉल पायांच्या नसांमध्ये जमा होतो. ज्यामुळे रक्तप्रवाहामध्ये अडथळा येतो.

2) जर आपल्याला थोडे देखील चालल्यानंतर धाप लागणे किंवा श्वास घेण्यास अडचण येत असेल तर वेळीच डॉक्टरांकडे जा. हृदयापर्यंत योग्य प्रमाणात ऑक्सिजन न पोहोचल्यास आपल्याला उच्च कोलेस्टेरॉलचा सामना करावा लागू शकतो.

3) चालताना छातीत दाब किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर काळजी घ्या. हे हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या एनजाइनाचे लक्षण असू शकते. या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका.

4) हवामानात बदल झाल्यास अनेकांचे हात-पाय थंड पडतात, हाता-पायांच्या बोटांना मुंग्या येतात. असं जर वारंवार होत असेल तर हे कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे होऊ शकते. शरीरात रक्ताभिसरणाची कमतरता जाणवल्यास किंवा पुरेसे रक्त न मिळाल्यास हात-पाय गार होतात.

5) आपले पाय किंवा घोटे चालल्यानंतर किंवा अचानक सुजले तर ही रक्ताभिसरणाची समस्या असू शकते. उच्च कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्यांवर दबाव येतो, ज्यामुळे शरीराच्या काही भागांमध्ये पाणी साचू लागते. ही लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

31 मिनिटे ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

35 मिनिटे ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

37 मिनिटे ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

48 मिनिटे ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

2 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

3 तास ago