जसजसं वय वाढत जातं, तसतशी लोकांना म्हातारणाची चिंता सतावत असते. बऱ्याच लोकांना हेच वाटत असतं की, त्यांनी नेहमीच तरूण दिसावं. त्यांचं आयुष्य वाढावं. अनेकांना १०० वर्ष आयुष्य जगण्याची ईच्छा असते. अनेक असेही देश आहेत जिथे लोकांचं सरासरी वय १०० पेक्षा जास्त असतं. आयुष्य कसं वाढवावं? अनेकांना या प्रश्नाचं उत्तर हवं असतं. उपवास म्हणजेच फास्टिंग केल्यानं तरूण बनता येऊ शकतं आणि हे जाणून घेण्यासाठी त्यांनी स्वत:वरच टेस्ट केली. टेस्टनंतर त्यांचं बायोलॉजिकल वय कमी झालं.
वय वाढतं राहणं हा तर निसर्गाचा नियम आहे. वेळ कुणासाठीही थांबत नसते. तुम्ही तुमचं खरं वय कमी करू शकत नाही, पण बायोलॉजिकल वय कमी केलं जाऊ शकत. हे कंट्रोल करून तुमचं संभावित आयुष्य वाढवलं जाऊ शकत.
काय असतं बायोलॉजिकल वय
एका ब्लड टेस्टच्या माध्यमातून बायालोॉजिकल वय माहीत करून घेता येतं. या टेस्टमधून शरीरातील वेगवेगळ्या अवयवांचं वय समजतं. हृदय, मेंदू, फुप्फुसं, टिश्यू इत्यादी कोणत्या वयानुसार काम करतात हे जाणून घेता येतं. हे कंट्रोल करून आजारांना दूर ठेवलं जाऊ शकतं. तुम्ही बाहेरून कितीही म्हातारे दिसले, तरी हृदय तरूणच रहाल.
उपवास करून कमी करू शकता वय
उपवास करून वाढतं वय कमी केलं जाऊ शकतं. त्यामुळे उपवास नक्की करावे. एक दिवसाच्या उपवासापासून सुरूवात करू शकता. डॉ. रवि यांनी ३ दिवस उपवास करण्याआधी आणि नंतर बायोलॉजिकल टेस्ट केली. जाणून घेऊ उपवासाच्या आधी आणि नंतर त्यांच्या अवयवांचं वय काय होतं.
अवयवांच आयुष्य वाढल
३ दिवस उपवास करण्याआधी बायोलॉजिकल वय
फुप्फुसांचं वय ३२.१ वर्ष, रक्ताचं वय ३५.७ वर्ष, लिव्हरचं वय ३१.१ वर्ष, हृदयाचं वय ३२.१ वर्ष, किडनीचं वय ३३ वर्ष, मेंदुचं वय ३४.४ वर्ष, त्यांचं मूळ वय २९ वर्ष.
३ दिवस उपवास केल्यानंतरचं बायोलॉजिकल वय
फुप्फुसांचं वय २७.९ वर्ष, रक्ताचं वय ३६.५ वर्ष, लिव्हरचं वय २९.६ वर्ष, हृदयाचं वय २९.५ वर्ष, किडनीचं वय ३०.८ वर्ष, मेंदुचं वय ३३.५ वर्ष, मूळ वय २९ वर्ष.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…
मुंबई: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत कथित वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात तीव्र…
मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…