जसजसं वय वाढत जातं, तसतशी लोकांना म्हातारणाची चिंता सतावत असते. बऱ्याच लोकांना हेच वाटत असतं की, त्यांनी नेहमीच तरूण दिसावं. त्यांचं आयुष्य वाढावं. अनेकांना १०० वर्ष आयुष्य जगण्याची ईच्छा असते. अनेक असेही देश आहेत जिथे लोकांचं सरासरी वय १०० पेक्षा जास्त असतं. आयुष्य कसं वाढवावं? अनेकांना या प्रश्नाचं उत्तर हवं असतं. उपवास म्हणजेच फास्टिंग केल्यानं तरूण बनता येऊ शकतं आणि हे जाणून घेण्यासाठी त्यांनी स्वत:वरच टेस्ट केली. टेस्टनंतर त्यांचं बायोलॉजिकल वय कमी झालं.
वय वाढतं राहणं हा तर निसर्गाचा नियम आहे. वेळ कुणासाठीही थांबत नसते. तुम्ही तुमचं खरं वय कमी करू शकत नाही, पण बायोलॉजिकल वय कमी केलं जाऊ शकत. हे कंट्रोल करून तुमचं संभावित आयुष्य वाढवलं जाऊ शकत.
काय असतं बायोलॉजिकल वय
एका ब्लड टेस्टच्या माध्यमातून बायालोॉजिकल वय माहीत करून घेता येतं. या टेस्टमधून शरीरातील वेगवेगळ्या अवयवांचं वय समजतं. हृदय, मेंदू, फुप्फुसं, टिश्यू इत्यादी कोणत्या वयानुसार काम करतात हे जाणून घेता येतं. हे कंट्रोल करून आजारांना दूर ठेवलं जाऊ शकतं. तुम्ही बाहेरून कितीही म्हातारे दिसले, तरी हृदय तरूणच रहाल.
उपवास करून कमी करू शकता वय
उपवास करून वाढतं वय कमी केलं जाऊ शकतं. त्यामुळे उपवास नक्की करावे. एक दिवसाच्या उपवासापासून सुरूवात करू शकता. डॉ. रवि यांनी ३ दिवस उपवास करण्याआधी आणि नंतर बायोलॉजिकल टेस्ट केली. जाणून घेऊ उपवासाच्या आधी आणि नंतर त्यांच्या अवयवांचं वय काय होतं.
अवयवांच आयुष्य वाढल
३ दिवस उपवास करण्याआधी बायोलॉजिकल वय
फुप्फुसांचं वय ३२.१ वर्ष, रक्ताचं वय ३५.७ वर्ष, लिव्हरचं वय ३१.१ वर्ष, हृदयाचं वय ३२.१ वर्ष, किडनीचं वय ३३ वर्ष, मेंदुचं वय ३४.४ वर्ष, त्यांचं मूळ वय २९ वर्ष.
३ दिवस उपवास केल्यानंतरचं बायोलॉजिकल वय
फुप्फुसांचं वय २७.९ वर्ष, रक्ताचं वय ३६.५ वर्ष, लिव्हरचं वय २९.६ वर्ष, हृदयाचं वय २९.५ वर्ष, किडनीचं वय ३०.८ वर्ष, मेंदुचं वय ३३.५ वर्ष, मूळ वय २९ वर्ष.
(सोशल मीडियावरून साभार)
आजकालच्या लाइफ स्टाईलमध्ये शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होऊन नसा ब्लॉक होणं एक सामान्य समस्या बनली आहे.…
लसणाच्या पाकळ्यात अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात. सूक्ष्मजंतू नष्ट करणारे प्रतिजैविक गुणधर्म…
एकता, कर्तव्य, युवाशक्ती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून विकसित भारत घडविण्याचा संदेश मुंबई: भारत हा केवळ भौगोलिक…
फास्ट ट्रॅक न्यायालये, १० वर्षांपर्यंत कारावास आणि १० कोटी दंडाच्या प्रस्तावित तरतुदींना शिंदेंचा पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या…
मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी…
मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे स्वागत करत अखिल भारतीय…