महाराष्ट्र

नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हा तरुणाईच्या संघर्षाचा विजय; सचिन सावंत

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे स्वागत करत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तेलंगणाचे प्रभारी सचिन सावंत यांनी हा “लोकशाही, तरुणाई आणि विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय” असल्याचे म्हटले. टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारवर शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांवरून जोरदार टीका केली.

सावंत म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नीट पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात देशव्यापी लढा उभारला. युवक काँग्रेस व NSUI च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आवाज संसद ते रस्त्यावर पोहोचवण्यात आला. गेल्या दहा वर्षांत देशभरात १५२ पेपरफुटीच्या घटना घडल्या, मात्र केंद्र सरकारने प्रभावी कारवाई केली नाही. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लाठीमार व पॅलेट गनचा वापर करण्यात आल्याचा आरोप करत गृहमंत्री अमित शाह यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.यावेळी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर टिळक भवन येथे पेढे वाटून व ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

MHT-CET बाबतही गंभीर आरोप

सचिन सावंत यांनी महाराष्ट्रातील MHT-CET 2026 परीक्षेच्या निकालावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. २०२२ पासून परीक्षेतील अनियमितता वाढल्याचा दावा करत त्यांनी गुणांकन, नॉर्मलायझेशन प्रक्रिया आणि रँकिंग अल्गोरिदमचे स्वतंत्र ऑडिट करण्याची मागणी केली.

त्यांच्या मते, दहावी-बारावीत ४० ते ६० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना MHT-CET मध्ये ९० ते ९९ पर्सेंटाइल मिळाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच यंदा जुळ्या भावांना एकसारखे गुण मिळाल्याने निकालाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सर्व प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Betterment Fee’ नव्हे, ‘Betterment Tax’

यावर्षी CAP प्रवेश प्रक्रियेत Betterment Fee च्या नावाखाली विद्यार्थ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकण्यात आल्याचा आरोपही सावंत यांनी केला. पूर्वी एकदाच ₹1,000 शुल्क भरून सर्व बेटरमेंट फेऱ्यांमध्ये सहभागी होता येत होते. मात्र आता Round 1, Round 2 आणि Round 3 साठी अनुक्रमे ₹1,000, ₹2,000 आणि ₹3,000 असे एकूण ₹6,000 शुल्क आकारले जात आहे. हा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर लादलेला “Betterment Tax” असून तो तातडीने रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली.

MHT-CET ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा असून तिची विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पारदर्शक करण्याची आणि निष्पक्ष चौकशी जाहीर करण्याची गरज असल्याचेही सचिन सावंत यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शरीरातून बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्याचा बेस्ट घरगुती उपाय

आजकालच्या लाइफ स्टाईलमध्ये शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होऊन नसा ब्लॉक होणं एक सामान्य समस्या बनली आहे.…

1 तास ago

लसणाचे औषधी गुणधर्म

लसणाच्या पाकळ्यात अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात. सूक्ष्मजंतू नष्ट करणारे प्रतिजैविक गुणधर्म…

2 तास ago

‘आपले राष्ट्र, आपला स्वाभिमान’; शक्तिशाली भारतासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन

एकता, कर्तव्य, युवाशक्ती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून विकसित भारत घडविण्याचा संदेश मुंबई: भारत हा केवळ भौगोलिक…

2 तास ago

नीट पेपर लीकविरोधात केंद्राच्या कठोर भूमिकेला महाराष्ट्राचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंचे स्वागत

फास्ट ट्रॅक न्यायालये, १० वर्षांपर्यंत कारावास आणि १० कोटी दंडाच्या प्रस्तावित तरतुदींना शिंदेंचा पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या…

2 तास ago

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा म्हणजे लढ्याचा शेवट नाही; मोदींनी देशाची माफी मागावी; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी…

2 तास ago

नागरिकांच्या सतर्कतेने आठवडे बाजारातील सलग सात चोरटे जेरबंद

मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार शिक्रापूर (): शिक्रापूर पोलीस ठाण्याने गेल्या दीड महिन्यापासून शिक्रापूर,…

22 तास ago