आरोग्य

आपापली विश्रांती शोधा

भरपूर झोपणं, म्हणजेच फक्त विश्रांती नाही. छोटासा ब्रेक घेऊन नित्याचा ताण कमी करण्यासाठी केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी यात येतात

खरंतर आपल्याला सात वेगवेगळ्या प्रकारांची विश्रांती हवी असते.

१) शारीरिक विश्रांती

झोपणे, शारीरिक श्रम किंवा हालचाली न करणे. डोळे, नाक, कान, त्वचा आणि जीभ या पाचही इंद्रियांना विश्राम देणे.

२)मानसिक विश्रांती

विचारांची, आठवणींची गती कमी करणे, थांबवणे. ध्यान किंवा योगाद्वारे मन शांत करणे.

३) भावनिक विश्रांती

स्वतःच्या मनात गोंधळ घालणाऱ्या भावनांकडे थोडे अलिप्त होऊन बघणे. त्या समजून घेणे, त्यांचा स्वीकार करणे, त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे.

४)सोशल विश्रांती

इतरांपासून काही काळ दूर राहणे. विशेषतः ताणतणावाच्या तसेच सतत खूप अपेक्षा करणाऱ्या संबंधांपासून लांब राहून स्वतःला प्राधान्य देणे.

५) सर्जनशील विश्रांती

आवाजाचा अभाव असलेले बोटांनी करायचे छंद जोपासणे. हस्तकला, चित्रकला, शिवण, मातीकाम, रंगकाम यांसारख्या गोष्टीत सहभागी होणे.

६) आध्यात्मिक विश्रांती 

ध्यान, प्रार्थना करणे. ऊर्जा देणाऱ्या विचारांवर लक्ष केंद्रित करणे. आपण म्हणजे केवळ हे शरीर ही चुकीची, संकुचित धारणा संपायला याची मदत होते.

७) प्राकृतिक विश्रांती

पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभुतांसोबत वेळ घालवणे. “निःशब्द होऊन हे महत्त्वाचं” जंगलात फिरणे, समुद्रकिनाऱ्यावर बसणे, आकाश दर्शन करणे. नुसतं झोपूनही थकवा जात नाही असं वाटतं असेल तर नक्कीच यापैकी अन्य कोणत्यातरी विश्रांतीची आवश्यकता आहे हे नक्की. कारण या सर्व प्रकारच्या विश्रांती आपल्या अस्तित्त्वासाठी आवश्यक असतात आणि त्यांचा संतुलित वापर केल्याने आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संसदीय कार्य विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मार्गदर्शक पुस्तिकांचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या संसदीय कार्य विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त तीन महत्त्वपूर्ण मार्गदर्शक पुस्तिकांचे प्रकाशन उच्च व…

18 मिनिटे ago

‘नालंदा’चा नाद करून स्तुतीचा अतिरेक; कृष्णराज महाडिकांवर टीकेची झोड

मुंबई: भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी कृष्णराज महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना “माझे नालंदा विद्यापीठ”…

21 मिनिटे ago

कल्याण वाहतूक कोंडीवर उपाययोजना, सॅटीस प्रकल्पाला गती; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…

2 दिवस ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसचा भाजपावर हल्ला; चर्चेसाठी नरेंद्र मोदी यांनाही आणा; प्रणिती शिंदे

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…

2 दिवस ago

मी उपमुख्यमंत्री नाही, भूमिपुत्र म्हणून आलो;  एकनाथ शिंदे

सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…

2 दिवस ago

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…

2 दिवस ago