CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75?
एखादा पदार्थ खुप जास्त प्रसिद्ध होतो. त्याची हाईप भरपूर असते. आर्थात त्याची चव काही फार जगा वेगळी नसते. तो तयार करण्यासाठी वापरलेल्या पदार्थांचा दर्जा काही फार चांगला नसतो. तरी लोकं विकत घेतात. पण ग्राहक असं का करतात? स्वास्थ्यासाठी हानिकारक पदार्थ जास्तीचे पैसे देऊन का विकत घेतात? याचे कारण म्हणजे कंपनीची मार्केटिंग स्ट्रेटेजी. सगळा खेळ या मार्केटिंगचा असतो. लोकांना आकर्षित करता येत असेल तर, उत्पादनाचा दर्जा कमी असला तरी विक्री भरपूर होते. कंपनींच्या जाळ्यात आपण फसतो. त्यांच्या तीन अशा स्ट्रेटेजी आहेत, ज्याबद्दल कळल्यावर तुमचे स्वास्थ्य आणि पैसे दोन्ही वाचतील.
तीन अशा स्ट्रेटेजी ज्या पॅकेट फूड इंडस्ट्रीसाठी फार महत्त्वाच्या ठरतात.
१) बरेचदा कंपनीच्या जाहिरातींमध्ये मोठ्या सेलिब्रिटीज असतात. जसं की क्रिकेटर, बॉलिवूडमधील स्टार इंस्टाग्रामवर व्हायरल झालेली व्यक्ती. ज्यांच्याकडे ग्राहक आकर्षित होतील, अशा लोकांना जाहिरातीत घेतात. त्यामुळे चाहत्यांच्या डोक्यात त्या पदार्थाविषयी विचार सुरू होतात. आणि त्यांनाही खायची इच्छा होते. जाहिरातींवर करोडो रुपये कंपनी खर्च करते. त्यातूनच त्यांचे पदार्थ नावारूपाला येतात.
२) जर तुम्ही जाहिरातींचे निरीक्षण केलेत तर लक्षात येईल की, ते बाल कलाकारांना काम देतात. समजा चॉकलेटची जाहिरात आहे. तर त्यात भरपूर लहान मुलं ते चॉकलेटचा आनंद लुटताना दाखवतात. त्या मुलांकडे बघून घरातील मुलं त्या चॉकलेटसाठी पालकांकडे हट्ट करतात. यात कंपनी पूर्णपणे चाईल्ड सायकलॉजीचा वापर करते. तो खात आहे ते मला पण हवं अशी मानसिकता लहान मुलांची असते. मुलांचा हट्ट पूर्ण करणं पालकांना भाग असतं. कंपनीची विक्री वाढते.
३) कंपन्या सर्वच पदार्थांत चव आणतात. जे पदार्थ चवीला फार छान लागत नाहीत, असे पदार्थही काही रसायने घालून चविष्ट करून कंपन्या विकतात. आपल्याला सांगताना फक्त त्यातील अर्ध्या गोष्टी सांगतात. ज्या पौष्टिक असतील. पण ज्या हानिकारक आहेत त्या सांगत नाहीत. अगदी कारल्यासारखे पदार्थही चविष्ट करून विकतात. त्यावर प्रक्रिया करून बाजारात आणतात. हे पदार्थ स्वास्थ्यासाठी प्रचंड वाईट.
(सोशल मीडियावरून साभार)
७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…
शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…