CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75?
एखादा पदार्थ खुप जास्त प्रसिद्ध होतो. त्याची हाईप भरपूर असते. आर्थात त्याची चव काही फार जगा वेगळी नसते. तो तयार करण्यासाठी वापरलेल्या पदार्थांचा दर्जा काही फार चांगला नसतो. तरी लोकं विकत घेतात. पण ग्राहक असं का करतात? स्वास्थ्यासाठी हानिकारक पदार्थ जास्तीचे पैसे देऊन का विकत घेतात? याचे कारण म्हणजे कंपनीची मार्केटिंग स्ट्रेटेजी. सगळा खेळ या मार्केटिंगचा असतो. लोकांना आकर्षित करता येत असेल तर, उत्पादनाचा दर्जा कमी असला तरी विक्री भरपूर होते. कंपनींच्या जाळ्यात आपण फसतो. त्यांच्या तीन अशा स्ट्रेटेजी आहेत, ज्याबद्दल कळल्यावर तुमचे स्वास्थ्य आणि पैसे दोन्ही वाचतील.
तीन अशा स्ट्रेटेजी ज्या पॅकेट फूड इंडस्ट्रीसाठी फार महत्त्वाच्या ठरतात.
१) बरेचदा कंपनीच्या जाहिरातींमध्ये मोठ्या सेलिब्रिटीज असतात. जसं की क्रिकेटर, बॉलिवूडमधील स्टार इंस्टाग्रामवर व्हायरल झालेली व्यक्ती. ज्यांच्याकडे ग्राहक आकर्षित होतील, अशा लोकांना जाहिरातीत घेतात. त्यामुळे चाहत्यांच्या डोक्यात त्या पदार्थाविषयी विचार सुरू होतात. आणि त्यांनाही खायची इच्छा होते. जाहिरातींवर करोडो रुपये कंपनी खर्च करते. त्यातूनच त्यांचे पदार्थ नावारूपाला येतात.
२) जर तुम्ही जाहिरातींचे निरीक्षण केलेत तर लक्षात येईल की, ते बाल कलाकारांना काम देतात. समजा चॉकलेटची जाहिरात आहे. तर त्यात भरपूर लहान मुलं ते चॉकलेटचा आनंद लुटताना दाखवतात. त्या मुलांकडे बघून घरातील मुलं त्या चॉकलेटसाठी पालकांकडे हट्ट करतात. यात कंपनी पूर्णपणे चाईल्ड सायकलॉजीचा वापर करते. तो खात आहे ते मला पण हवं अशी मानसिकता लहान मुलांची असते. मुलांचा हट्ट पूर्ण करणं पालकांना भाग असतं. कंपनीची विक्री वाढते.
३) कंपन्या सर्वच पदार्थांत चव आणतात. जे पदार्थ चवीला फार छान लागत नाहीत, असे पदार्थही काही रसायने घालून चविष्ट करून कंपन्या विकतात. आपल्याला सांगताना फक्त त्यातील अर्ध्या गोष्टी सांगतात. ज्या पौष्टिक असतील. पण ज्या हानिकारक आहेत त्या सांगत नाहीत. अगदी कारल्यासारखे पदार्थही चविष्ट करून विकतात. त्यावर प्रक्रिया करून बाजारात आणतात. हे पदार्थ स्वास्थ्यासाठी प्रचंड वाईट.
(सोशल मीडियावरून साभार)
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…
दूध एक कप्लीट फूड आहे ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे न्युट्रिएंट्स असतात म्हणून आई-वडील लहानपणा पासूनच दूध…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील जांबुत ग्रामपंचायतीचे सरपंच दत्तात्रय रामचंद्र जोरी यांच्याविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास…
संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com शिरूर : शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होऊन दोन महिने…
मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…