आरोग्य

ऐन तारुण्यात नजर धुसर-चष्मा लागला? तुपात हा पदार्थ कालवून खा, डोळे सांभाळा

आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये गॅजेट्सचा वाढता वापर आणि दिवस रात्र मोबाईल, लॅपटॉपमध्ये घुसून राहिल्यामुळे डोळ्यांमुळे चुकीचा परिणाम होत आहे..ज्यामुळे अनेकांची डोळ्यांची दृष्टी कमी होत आहे. कमी वयात डोळे कमकुवत होणं अनेक आजारांचे कारण ठरू शकते. एकदा डोळ्यांची रोशनी कमी झाली तर पुन्हा नजर चांगली करण्यासाठी महागड्या ट्रिटमेंट्स घ्याव्या लागतात. दृष्टी चांगली ठेवण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्सचा वापर करू शकता.

अधुनिक जीवनशैली, दीर्घकाळ स्किनचा उपयोग, अन्हेल्दी डाएट आणि ताण-तणाव यांमुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. आयुर्वेद आणि घरगुती उपायांमध्ये काही खास प्राकृतिक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. यातीलच एक म्हणजे तूप आणि काळ्या मिरीचे मिश्रण आयुर्वेदात एक प्रभावी उपाय आहे.

एमएम चोकसी आय हॉस्पीटलच्या रिपोर्ट नुसार नेत्रविकारतज्ज्ञ सांगतात की, तुम्ही दैनंदिन आहारात गाईचे तूप वापरू शकता. ज्यामुळे मेंदूचा विकास आणि दृष्टीचा विकास होण्यास मदत होते. रोजच्या आहारात तुपाचा समावेश केल्यास डाएट सुधारते आणि आयसाईट सुधारण्यास मदत होते. तूप भारतीय स्वंयपाक घरातील एक महत्वाचा घटक आहे (Ref). यात व्हिटामीन ए, डी, ई आणि के असते. ज्यामुळे शरीरातील पोषणातील कमतरता दूर होते आणि सेल्सच्या विकासात मदत होते. तूपचा वापर फक्त स्वंयपाकात केला जात नाही तर आयुर्वेदीक उपचारांमध्येही खास महत्व दिले गेले आहे.

काळी मिरीची उपयोग आयुर्वेदात एक औषधी मसाल्यांच्या स्वरूपात केला जातो. यात पिपेरिन नावाचे तत्व असते ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. शरीराची इम्यूनिटी वाढते आणि पोषक तत्वांचे अवशोषण होण्यास मदत होते. व्हिटामीन ए डोळ्यांसाठी महत्वाचे असते. यामुळे रेटीनाचची कार्यक्षमता वाढते आणि नाईट ब्लाईंडनेस पासून बचाव होतो.

तुपात व्हिटामीन ए असते जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. काळ्या मिरीत एंटी ऑक्सिडेंट्स गुण असतात जे फ्री रेडिकल्स पासून लढण्यास मदत करतात. फ्रि रेडीकल्स डोळ्यांच्या पेशींना नुकसान पोहोचवू शकतात. ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी कमी होऊ लागते. काळ्या मिरीचे सेवन केल्यानं हानीकारक तत्वांपासून बचाव होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

2 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

3 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

3 तास ago

शिंदे गटाला निकालाआधीच टेन्शन? ‘धनुष्यबाण ठाकरेंनाच मिळणार’; असीम सरोदे यांचा मोठा दावा

मुंबई: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, आजपासून शिंदे…

3 तास ago

अष्टविनायक यात्रा म्हणजे श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम; जाणून घ्या आठही गणरायांचे महत्त्व

Pपुणे : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत अष्टविनायक यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीगणेशाची आठ…

3 तास ago

धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणाऱ्यांवर शिंदेंची खरमरीत टीका; ‘उबाठा’वर निशाणा

नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९…

4 तास ago