आरोग्य

रात्री झोपण्याआधी गुळ खाण्याचे आरोगयदायी फायदे

थंडीच्या दिवसात गुळ खाणे सर्वाना आवडते कारण गुळात गर्मी जास्त असते. गुळ खाल्ल्याने शरीरात गर्मी वाढते. पोटाच्या सर्व विकारांवर गुळ अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे. तुमच्या शरीरासाठी गुळ म्हणजे एका अमृता समान आहे. तुम्हाला सांगतो गुळ खूप साऱ्या रोगांवर उपयोगी पडतो.

रोज गुळ खाल्ल्याने होणारे फायदे
१) रोज गुळ खाल्ल्याने पचन क्रिया सुरळीत राहते , तसेच तुमच्या पोटात कधीच गॅस होणार नाही.
२) गुळ महिलांच्या मासिक पाळीतही फायदेशीर ठरतो. मासिकपाळी आल्यावर पोट दुखी होते अशात गुळ खाल्ला तर पोट दुखायचे त्वरित थांबेल.
३) रोज गुळाचे सेवन केल्याने त्वचेला तेज येते आणि चेहऱ्यावरील पुरळ सुद्धा कमी होऊ लागतात.
४) सर्दी, खोकला येत असेल तर गुळाचा लाडू बनवून किंवा चहा मध्ये गुळ टाकून पिल्याने आराम मिळतो.
५) गुळ खाल्ल्याने तुम्हाला थकवा कधीच नाही जाणवणार. आणि शरीरात नेहमी ऊर्जा राहील.
६) गुळात कुठल्याही ऍलर्जी विरुद्ध लढणारी तत्व असतात. दम्याच्या पेशंटला गुळाचा खूप फायदा होतो.
७) गुळाला आल्या सोबत गरम करून खाल्ल्याने गळ्याचे आजार दूर होतात.

गरम दुधाबरोबर गूळ खायचे फायदे
१) गरम दुधाबरोबर गूळ खाणं तब्येतीसाठी चांगलं आहे. हे दोन्ही एकाच वेळी खाल्ल्यामुळे मोठ्यातला मोठा आजारही बरा होऊ शकतो.
२) रोज दुध प्यायल्याचे फायदे तसे सगळ्यांनाच माहिती आहेत, पण गरम दुधाबरोबर गूळ खाल्ल्यामुळे वजन कंट्रोलमध्ये राहतं, तसंच त्वचेला निखार येतो. दुधामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि डी तसंच कॅल्शियम, प्रोटीन आणि लॅक्टिक ऍसिड असतं. तर गुळामध्ये सुक्रोज, ग्लुकोज, कॅल्शियम, फॉस्फरस, लोखंड असतं.

३) शरीरातलं अशुद्ध रक्त साफ होतं: गुळामध्ये असलेल्या गुणांमुळे शरिरातील अशुद्ध रक्त शुद्ध होतं. त्यामुळे गरम दुध आणि गुळ खाल्ल्यामुळे तुम्ही आजारांपासून दूर राहू शकता.

४) लठ्ठपणा नियंत्रणात: गरम दुधामध्ये साखर घालण्याऐवजी गूळ घातला तर लठ्ठपणा नियंत्रणामध्ये राहायला मदत होते.

५) पोटाचे विकार दूर होतात: गरम दुध आणि गुळाचं सेवन केल्यामुळे पोटाचे आणि पचनाचे विकार दुर होतात.

६) सांधेदुखी वर उपाय: गूळ खाल्ल्यामुळे सांधेदुखीला आराम मिळतो. रोज गूळ आणि आल्याचा तुकडा एकत्र करुन खाल्ला तर सांधे मजबूत होतात.

७) त्वचा मुलायम होते: गरम दुध आणि गूळ खाल्ल्यामुळे त्वचा मुलायम होते. एवढच नाही तर यामुळे केसही मजबूत होतात.

८) मासिक पाळीचा त्रास कमी होतो: मासिक पाळीवेळी महिलांनी गरम दुध आणि गूळ खाल्ला तर त्रास कमी होतो. मासिक पाळी यायच्या एक आठवडा आधी 1 चमचा गूळ रोज खाल्ला तर त्रास कमी होतो.

९) थकवा कमी होतो: कामाच्या ताणामुळे तुम्ही जास्त थकले असाल तर गरम दुध आणि गूळ खा. यामुळे लगेच आराम मिळतो. रोज 3 चमचे गूळ खाल्ल्यानं थकवा दूर होतो.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नातं हृदयाशी; बायपास सर्जरी

बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…

1 तास ago

दक्षिणेत भाजपाला नकार, केरळमध्ये काँग्रेसचा विजय लोकशाहीचा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…

1 तास ago

पश्चिम बंगाल, आसाम निकालांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

मुंबई: शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम बंगाल व आसाम विधानसभा…

1 तास ago

महाराष्ट्र हादरला! ३ वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणाने संताप

मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. नुकत्याच समोर आलेल्या…

6 तास ago

बारामती पोटनिवडणूक निकाल! ‘हा शेवट नाही, नव्या बारामतीची सुरुवात’; सुनेत्रा अजित पवार

मुंबई: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना मतदारांनी दाखवलेला विश्वास हा “आदरणीय अजितदादांच्या पवित्र…

6 तास ago

बीडसह राज्यात अल्पवयीनांवरील अत्याचारांच्या घटनांनी खळबळ; जलद न्याय आणि कडक कारवाईची मागणी तीव्र

पालकांची वाढती चिंता, समाजजागृती आणि यंत्रणांच्या जबाबदारीवर पुन्हा प्रश्नचिन्ह मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या सलग…

6 तास ago