आरोग्य

मुळा खाण्याचे आरोग्यदायी फायदे

मुळा खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हिवाळ्यात शरीरासाठी लाभदायक असलेलं कंदमुळ म्हणजे मुळा. मुळा जर खायला आवडत नसला तरी त्याची भाजी, किंवा पराठा बनवून खाल्ला पाहिजे.

मुळ्याच्या ताज्या पानांचा रस आणि बियांमुळे लघवी स्वच्छ होते. मूतखडाही बरा होतो.

मुळा किडनीच्या विविध विकारांवर औषधी ठरतं.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतं.

कच्चा मुळा दररोज पहाटे अनुशा पोटी खाल्ल्याने काही दिवसातच कावीळ पूर्णत: बरी होते.

मुळा पाणीदार असल्याने याच्या सेवनाने भूक शमते. म्हणून वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी याचं सेवन करावं.

मुळा खाल्ल्याने रक्त शुद्ध होते. रक्तात ऑक्सिजनचा पुरवठाही होतो.

पिवळे दात पांढरेशुभ्र करण्यासाठी मुळ्याच्या तुकड्यावर लिंबू पिळून तो तुकडा थोडा वेळ चावून थुंकून टाका. या उपायाने दात चमकदार होतील.

मुळा वजन कमी करण्यास लाभदायक आहे. जेवताना मुळा खाल्ल्याने लवकर पोट भरते. अतिखाण्या पासूनही बचाव होतो. मुळ्यात जास्त उष्मांकही नसतो.

ज्यांची पचनक्रिया व्यवस्थित नाही आणि पोट साफ होत नसेल, त्यांनी कच्चा मुळा खावा. मूळव्याध कमी करण्यास मुळा फायदेशीर आहे.

मुळ्यात असलेल्या क जीवनसत्त्व, फॉस्फरस, झिंक व बी-कॉम्प्लेक्स मुळे त्वचाविकार दूर होतात. यात भरपूर पाणी असल्याने त्वचेचा ओलावा राहतो. तसेच त्वचा कोरडी किंवा निर्जीव होत नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

11 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

11 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

11 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

12 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

13 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

13 तास ago