sandeep-singh-gill
रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील खंडाळे आणि रांजणगाव हद्दीत जळालेले मृतदेह सापडून सात दिवस उलटले तरी आरोपी सापडलेले नाहीत. यासाठी विशेष पोलिस पथक नेमण्यात येणार आहे. राज्यातील दहा हजार मिसींग तपासण्यात आले असून, CCTV फुटेजवर टीम काम करत आहे. मृतदेहांच्या तपासासाठी विशेष पोलिस पथक नेमण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.
खंडाळे आणि रांजणगाव हद्दीत जळालेले मृतदेह सापडून सात दिवस उलटले तरी आरोपी सापडलेले नाहीत. यासाठी विशेष पोलिस पथक नेमण्यात येणार आहे. पुणे-नगर महामार्गावरील गावांची लोकसंख्या पाच ते सहा पटींनी वाढली असून, भाडेकरूंविषयी अद्ययावत माहिती नसल्याने तपासात अडथळे येत आहेत. यावर उपाय म्हणून भाडे कराराचे अॅप तयार केले जाणार असून, बाहेरून येणाऱ्या व्यक्तींची माहिती देणे आणि भाडेकरूंची कागदपत्रे पोलिस पाटील, सरपंच आणि ग्रामपंचायतीला सादर करणे घरमालकांना बंधनकारक केले जाईल. खंडाळे आणि रांजणगाव हद्दीत आढळलेल्या जळालेल्या मृतदेहांच्या तपासासाठी विशेष पोलिस पथक नेमण्यात येणार आहे, असे पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी सांगितले.
शिरूर तालुक्यातील पोलिस पाटलांच्या बैठकीत गिल बोलत होते. यावेळी पोलिस पाटलांनी तालुक्यातील काही समस्या मांडल्या. यामध्ये मोटारसायकल चोरीचे वाढते प्रमाण, बिबट्याचा वाढता उपद्रव, बेट भागातील अवैध धर्मांतर, गुर्हाळांमुळे परप्रांतीयांचा वाढता भरणा, चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील अपघात आणि पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी यांचा समावेश आहे. या समस्यांवर लवकरात लवकर उपाययोजना केल्या जातील, असे गिल यांनी आश्वासन दिले.
पोलिस पाटील हे पोलिसांचे नाक आणि डोळे असून, गावातील अनुचित घटना, संशयित आणि अनोळखी व्यक्तींची माहिती तात्काळ पोलिसांना देणे आवश्यक आहे. तसेच, ग्रामपंचायत प्रशासन, पोलिस पाटील, पोलिस आणि ग्रामस्थांनी नोकरी-व्यवसायानिमित्त येणाऱ्या भाडेकरूंवर कडक नजर ठेवावी. शाळा-महाविद्यालयांबाहेर टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस तत्पर राहतील. पोलिस पाटलांनी महिन्यातून एकदा गावातील माहिती अधिकाऱ्यांना द्यावी आणि अंमलदाराने आठवड्यातून एकदा गावाला भेट द्यावी. रोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थ आणि कुटुंबियांचा सहभाग आवश्यक आहे. मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत, तरुणांनी सायबर गुन्ह्यांपासून सावध राहावे, ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करावी आणि सर्व ग्रामपंचायतींनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा सूचना पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, केंदूर ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याशिवाय घराची नोंद न करण्याचा निर्णय घेतला, तर जातेगाव बुद्रुक येथे मुलींना लाठी-काठी प्रशिक्षण दिले जात आहे. या दोन्ही उपक्रमांचे गिल यांनी कौतुक केले आहे.
रांजणगाव; तिहेरी हत्याकांडातील आरोपीचा शोध सुरुच; मृतदेहाची ओळख अद्यापही पटेना
शिरूर तालुका तिहेरी हत्याकांडाने हादरला; महिलेसह दोन चिमुकल्यांची क्रूर हत्या…
शिरूर शहरात बंद घर फोडून दागिने चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
शिरूर बसस्थानकावरून पर्समधुन ८ तोळे सोने चोरी करणा-या त्या सराईत दोन महीला आरोपींना केले जेरबंद
शिरूर येथे लाखोंच्या फसवणुकीचा प्रकार उघड, पोलिसांकडून तपास सुरू
७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…
शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…