आषाढी एकादशीचा उपवास अनेकजण श्रद्धेने करतात. काहीजण उपवासाच्या पदार्थांचा आनंद घेण्यासाठी उपवास करतात. पण, उपवासाचे पदार्थ सर्वांनाच पचतातच असे नाही. अनेकांना पित्त होतं तर कोणाला अजीर्णाचे ढेकर येतात. उपवासाचा त्रास होऊ नये यासाठी वेळीच काळजी घ्यायला हवी. उपवास करताना ज्या प्रमाणे आपण काय खायचं, काय खाऊ नये हे लक्षात घेतो, त्याचप्रमाणे उपवास सोडाना काय खावं ते सुद्धा पाहायला हवं. कारण यामुळे तब्येतीची विकार उद्भवत नाहीत आणि उपवासाचा त्रासही होत नाही.
उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असल्यामुळे अनेकजण सकाळी फक्त चहा-बिस्कीट खातात. त्यानंतर थेट १२ किंवा १ वाजता जेवतात. पण आदल्या दिवशी उपवास असेल तर असं करणं टाळावं. सवय असेल तर सकाळी कमी चहा घ्या. जमल्यास नाश्ता करा अन्यथा पचनाचे विकार उद्भवू शकतात किंवा डोकेदुखीसुद्धा होते. सकाळी फळं खाऊ शकता किंवा फ्रुट ज्यूस घ्या. केळी, संत्री या पदार्थांचे सेवन करा. किंवा रात्री पाण्यात भिजवलेले ड्राय फ्रुट्स सकाळी खा. अखरोट, काजू, द्राक्ष, मनुके, बटाटे, भात, गहू, ज्वारी या पदार्थांचा आहारात समावेश करा.
उपवासाच्या दुसऱ्या दिवशी तिखट, मसालेयुक्त, तळलेले पदार्थ खाणं टाळा, उपवासामुळे पोटाला एक प्रकारचा आराम मिळतो. पण पोटाला जास्त ताण दिल्याने पचनावर याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून हलका आहार घ्या. जेवणात गोड पदार्थ असतातच अशावेळी तांदूळाची किंवा गव्हाची खीर, शेवयांची खीर असे पदार्थ बनवा कारण खिरीत प्रथिनांचे प्रमाण जास्त असते यात कर्बोदकं असतात. उपवास सोडताना खीर खाल्ल्याने अशक्तपणाची तक्रार दूर होते. याशिवाय खीर करताना त्यात साखर कमी प्रमाणात घाला किंवा साखरेऐवजी गुळाचा वापर करा.
पावसाळ्यात दुधाचा चहा प्यायल्याने काय होतं नुकसान? घ्या जाणून…
घरातील झुरळ कसे बाहेर काढाल? सोपे उपाय पाहा…
दिवसभरात किती कप कॉफी पिणं योग्य? घ्या जाणून…
मिक्स्ड फ्रूट ज्यूस पिताय तर जरा थांबा; शरिरासाठी ठरू शकते घातक…
कोमट पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?; घ्या जाणून…
डेंग्यू झाल्यावर रूग्णानी काळजी कशी घ्यावी? घ्या जाणून…
मूग डाळीचं पाणी पिण्याचे फायदे
साखरेपेक्षा खडीसाखरेला आहे जास्त महत्व, पहा फायदे
पीत्त होण्याची कारणे आणि उपाय…
मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…
मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…
मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…
नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…