आरोग्य

एकादशीचा उपवास कसा सोडावा?

आषाढी एकादशीचा उपवास अनेकजण श्रद्धेने करतात. काहीजण उपवासाच्या पदार्थांचा आनंद घेण्यासाठी उपवास करतात. पण, उपवासाचे पदार्थ सर्वांनाच पचतातच असे नाही. अनेकांना पित्त होतं तर कोणाला अजीर्णाचे ढेकर येतात. उपवासाचा त्रास होऊ नये यासाठी वेळीच काळजी घ्यायला हवी. उपवास करताना ज्या प्रमाणे आपण काय खायचं, काय खाऊ नये हे लक्षात घेतो, त्याचप्रमाणे उपवास सोडाना काय खावं ते सुद्धा पाहायला हवं. कारण यामुळे तब्येतीची विकार उद्भवत नाहीत आणि उपवासाचा त्रासही होत नाही.

उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असल्यामुळे अनेकजण सकाळी फक्त चहा-बिस्कीट खातात. त्यानंतर थेट १२ किंवा १ वाजता जेवतात. पण आदल्या दिवशी उपवास असेल तर असं करणं टाळावं. सवय असेल तर सकाळी कमी चहा घ्या. जमल्यास नाश्ता करा अन्यथा पचनाचे विकार उद्भवू शकतात किंवा डोकेदुखीसुद्धा होते. सकाळी फळं खाऊ शकता किंवा फ्रुट ज्यूस घ्या. केळी, संत्री या पदार्थांचे सेवन करा. किंवा रात्री पाण्यात भिजवलेले ड्राय फ्रुट्स सकाळी खा. अखरोट, काजू, द्राक्ष, मनुके, बटाटे, भात, गहू, ज्वारी या पदार्थांचा आहारात समावेश करा.

उपवासाच्या दुसऱ्या दिवशी तिखट, मसालेयुक्त, तळलेले पदार्थ खाणं टाळा, उपवासामुळे पोटाला एक प्रकारचा आराम मिळतो. पण पोटाला जास्त ताण दिल्याने पचनावर याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून हलका आहार घ्या. जेवणात गोड पदार्थ असतातच अशावेळी तांदूळाची किंवा गव्हाची खीर, शेवयांची खीर असे पदार्थ बनवा कारण खिरीत प्रथिनांचे प्रमाण जास्त असते यात कर्बोदकं असतात. उपवास सोडताना खीर खाल्ल्याने अशक्तपणाची तक्रार दूर होते. याशिवाय खीर करताना त्यात साखर कमी प्रमाणात घाला किंवा साखरेऐवजी गुळाचा वापर करा.

पावसाळ्यात दुधाचा चहा प्यायल्याने काय होतं नुकसान? घ्या जाणून…

घरातील झुरळ कसे बाहेर काढाल? सोपे उपाय पाहा…

दिवसभरात किती कप कॉफी पिणं योग्य? घ्या जाणून…

मिक्स्ड फ्रूट ज्यूस पिताय तर जरा थांबा; शरिरासाठी ठरू शकते घातक…

कोमट पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?; घ्या जाणून…

डेंग्यू झाल्यावर रूग्णानी काळजी कशी घ्यावी? घ्या जाणून…

मूग डाळीचं पाणी पिण्याचे फायदे

साखरेपेक्षा खडीसाखरेला आहे जास्त महत्व, पहा फायदे 

पीत्त होण्याची कारणे आणि उपाय…

बडिशेप हे पचनसंस्थेसाठी उत्तम औषध

कोथिंबीर, कांदा, लसूण यांचे आरोग्यासाठी मोठे फायदे 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

5 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

5 तास ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

5 तास ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

5 तास ago

UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…

5 तास ago

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…

5 तास ago