आरोग्य

एकादशीचा उपवास कसा सोडावा?

आषाढी एकादशीचा उपवास अनेकजण श्रद्धेने करतात. काहीजण उपवासाच्या पदार्थांचा आनंद घेण्यासाठी उपवास करतात. पण, उपवासाचे पदार्थ सर्वांनाच पचतातच असे नाही. अनेकांना पित्त होतं तर कोणाला अजीर्णाचे ढेकर येतात. उपवासाचा त्रास होऊ नये यासाठी वेळीच काळजी घ्यायला हवी. उपवास करताना ज्या प्रमाणे आपण काय खायचं, काय खाऊ नये हे लक्षात घेतो, त्याचप्रमाणे उपवास सोडाना काय खावं ते सुद्धा पाहायला हवं. कारण यामुळे तब्येतीची विकार उद्भवत नाहीत आणि उपवासाचा त्रासही होत नाही.

उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असल्यामुळे अनेकजण सकाळी फक्त चहा-बिस्कीट खातात. त्यानंतर थेट १२ किंवा १ वाजता जेवतात. पण आदल्या दिवशी उपवास असेल तर असं करणं टाळावं. सवय असेल तर सकाळी कमी चहा घ्या. जमल्यास नाश्ता करा अन्यथा पचनाचे विकार उद्भवू शकतात किंवा डोकेदुखीसुद्धा होते. सकाळी फळं खाऊ शकता किंवा फ्रुट ज्यूस घ्या. केळी, संत्री या पदार्थांचे सेवन करा. किंवा रात्री पाण्यात भिजवलेले ड्राय फ्रुट्स सकाळी खा. अखरोट, काजू, द्राक्ष, मनुके, बटाटे, भात, गहू, ज्वारी या पदार्थांचा आहारात समावेश करा.

उपवासाच्या दुसऱ्या दिवशी तिखट, मसालेयुक्त, तळलेले पदार्थ खाणं टाळा, उपवासामुळे पोटाला एक प्रकारचा आराम मिळतो. पण पोटाला जास्त ताण दिल्याने पचनावर याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून हलका आहार घ्या. जेवणात गोड पदार्थ असतातच अशावेळी तांदूळाची किंवा गव्हाची खीर, शेवयांची खीर असे पदार्थ बनवा कारण खिरीत प्रथिनांचे प्रमाण जास्त असते यात कर्बोदकं असतात. उपवास सोडताना खीर खाल्ल्याने अशक्तपणाची तक्रार दूर होते. याशिवाय खीर करताना त्यात साखर कमी प्रमाणात घाला किंवा साखरेऐवजी गुळाचा वापर करा.

पावसाळ्यात दुधाचा चहा प्यायल्याने काय होतं नुकसान? घ्या जाणून…

घरातील झुरळ कसे बाहेर काढाल? सोपे उपाय पाहा…

दिवसभरात किती कप कॉफी पिणं योग्य? घ्या जाणून…

मिक्स्ड फ्रूट ज्यूस पिताय तर जरा थांबा; शरिरासाठी ठरू शकते घातक…

कोमट पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?; घ्या जाणून…

डेंग्यू झाल्यावर रूग्णानी काळजी कशी घ्यावी? घ्या जाणून…

मूग डाळीचं पाणी पिण्याचे फायदे

साखरेपेक्षा खडीसाखरेला आहे जास्त महत्व, पहा फायदे 

पीत्त होण्याची कारणे आणि उपाय…

बडिशेप हे पचनसंस्थेसाठी उत्तम औषध

कोथिंबीर, कांदा, लसूण यांचे आरोग्यासाठी मोठे फायदे 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

28 मिनिटे ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

36 मिनिटे ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

42 मिनिटे ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

47 मिनिटे ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

6 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

6 तास ago