जेवणात दिसणारी हिरवीगार कोथिंबीर फक्त सजावटीसाठी वापरली नसून, ती म्हणजे आरोग्याचा खजिना आहे. कोथिंबीर खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते, रक्त शुध्द होतं आणि मूत्रासंबंधी त्रास कमी होतो. जर रोजच्या आहारात कोथिंबीर असली, तर आरोग्य चांगलं राहणं हमखास ठरलेलं आहे.
कोथिंबीर सलाड मध्ये टाकली की त्याची चव दुप्पट होते. हिरवीगार चटणी बनवून खाताना जेवणातली मजाच वेगळी असते. कोथिंबीर भाजी, दाल, आमटी, सूप किंवा रायत्या मध्ये वापरू शकता. दिवसातून साधारण १५ ते २० पाने तरी खाल्ली, तर शरीराला पुरेसं पोषण मिळतं. कोथिंबीर सकाळी उपाशीपोटी चटणीच्या स्वरूपात खाल्ल्यास रक्त शुध्दीकरणात जास्त मदत होते. कोथिंबीर मूत्रवर्धक आहे, त्यामुळे शरीरातला अतिरिक्त पाणी आणि मीठ बाहेर टाकायला मदत करते. ज्यांना वारंवार सूज येते, लघवीसंबंधी त्रास होतो त्यांच्यासाठी ही औषधासारखी काम करते. यामध्ये असणारे नैसर्गिक घटक पचनक्रिया सुधारतात, अपचन, गॅस आणि पोटफुगी पासून आराम मिळतो. तसेच रक्तातील अशुध्दता कमी करून त्वचाही स्वच्छ व तजेलदार ठेवते.
कोथिंबीरचा वापर जास्त करून जेवणासोबत करावा. सकाळी नाश्त्यासोबत हिरवी चटणी, दुपारच्या जेवणात सलाड, रात्रीच्या आमटीत वरून टाकलेली कोथिंबीर असा नियमित वापर सर्वात चांगला आहे. दिवसातून साधारण एक मूठभर कोथिंबीर खाल्ल्यास पचन आणि मूत्रसंस्था दोन्ही तंदुरुस्त राहतात. मात्र अतिशय जास्त प्रमाणात सेवन केल्यास थोडासा त्रास होऊ शकतो, त्यामुळे संतुलित प्रमाणातच वापरणं योग्य. कोथिंबीर ही केवळ सजावटीची पानं नाहीत, तर आरोग्यासाठी वरदान आहेत. जेवणातली छोटीशी हिरवीगार सजावट आपलं आरोग्य टिकवण्याचं मोठं काम करते. म्हणूनच रोजच्या आहारात कोथिंबीर जरूर वापरा.
(सोशल मीडियावरून साभार)
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…