केस गळण्याच्या समस्येनं प्रत्येकजण त्रस्त असतो. आपले केस लांबसडक, दाट असावेत असं प्रत्येकालाच वाटतं. केसांची काळजी घेण्यासाठी आणि केसांना हेल्दी बनवण्यासाठी बाजारात बऱ्याच ट्रिटमेंट्स उपलब्ध आहेत पण याचा फारचा उपयोग दिसून येत नाही. तुम्हाला नैसर्गिक पद्धतीनं केस वाढवायचे असतील तर तुम्ही काही घरगुती उपाय करून केसांना लांब, दाट बनवू शकता. झोपण्याआधी काही खास पदार्थ केसांना लावून तुम्ही केसांचे आरोग्य सुधारू शकता.
केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय
१) नारळाचं तेल
नारळाच्या तेलानं केसांच्या मुळांची मालिश केल्यानं केसांच्या मुळांना पोषण मिळते. ज्यामुळे केसांमध्ये मॉईश्चर टिकून राहते. केसांमध्ये कोंडा होत नाही. हलक्या गरम नारळाच्या तेलानं केसांची मालिश करा आणि रात्रभर तसंच सोडून द्या आणि सकाळी शॅम्पूने केस धुवा. या उपायानं केस मऊ, मुलायम होतील. केस तुटण्याची समस्या उद्भवणार नाही. तसंच केसांची वाढही भराभर होईल.
२) एलोवेरा जेल
एलोवेरामध्ये प्राकृतिक एंजाईम्स असतात ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते. ताजं एलोवेरा जेल स्काल्पवर लावून हळूहळू मसाज करा. रात्रभर तसंच सोडून द्या. हा घरगुती उपाय केल्यानं केसांची हरवलेली चमक परत येईल आणि केस दाट होतील.
३) कांद्याचा रस
कांद्याच्या रसात सल्फर असते. ज्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात आणि नवीन केस उगवण्यास मदत होते. कांद्याचा रस काढून केसांच्या मुळांना लावल्यास केस गळण्याच्या त्रासापासून सुटका होते आणि केस वेगानं वाढतात.
४) मेथीच्या बीया
मेथीच्या बीयांमध्ये प्रोटीन आणि निकोटिनिक एसिड असते. ज्यामुळे केसांना पोषण मिळते. मेथीच्या बीया रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी याची पेस्ट बनवून केसांच्या मुळांना लावा.
५) दही आणि मध
दही आणि मधाचं मिश्रण केसांसाठी नॅच्युरल कंडिशनरप्रमाणे काम करते. दह्यात १ चमचा मध मिसळून केसांच्या मुळांना लावल्यानं या उपायाने केस सॉफ्ट, शायनी, मजबूत होतील.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…
अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…