आरोग्य

टाचदुखीवर घरगुती उपाय

आपण दिवसभर ज्या पायांवर उभे असतो ते पाय मजबूत आणि कणखर असणं गरजेचं असतं. मात्र कधी आपल्या पोटऱ्या दुखतात तर कधी गुडघे. मात्र टाचदुखी ही तर बहुतांश महिलांमध्ये अतिशय सामान्य समस्या असल्याचे दिसते. टाचा दुखल्या तरी आपण त्याकडे म्हणावे तसे लक्ष देत नाही. पण कालांतराने ही समस्या मोठी होत जाते आणि आपले जगणे अवघड करते. दिवसभर उभे राहून काम करताना किंवा घरात, बाहेर वावरताना आपल्याला हे लक्षात येत नाही. मात्र अनेकदा सकाळी उठल्यावर आपल्याला टाच किंवा पाय जमिनीवर टेकवताच येत नाही. बरेच दिवस आपण हे दुखणे अंगावर काढतो, मात्र कालांतराने हा त्रास वाढत जातो. पूर्वी टाचदुखीची समस्या वयाच्या चाळीशीनंतर सुरू व्हायची मात्र आता अगदी लहान वयातील मुलींनाही टाचदुखीचा त्रास उद्भवतो.

१ वाढतं वजन…

आपल्या वजनाचा पूर्ण भार आपल्या शरीरावर येत असतो. त्यामुळे वजन सतत वाढत असेल तर त्यामुळे टाचा दुखू शकतात. यासाठी व्यायाम, आहार यांचा योग्य प्रकारे अवलंब करुन वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते.

२) चपला किंवा बूट…

आपल्या चपलांचा साईज चुकीचा असेल तरी टाचांना त्याचा त्रास होतो. इतकेच नाही तर चपलांचे सोल चांगल्या दर्जाचे नसेल, खूप मोठ्या हिल्स सतत घालत असू तरी पाय आणि टाचा दुखण्याचे प्रमाण वाढते. यासाठी योग्य मापाच्या, चांगल्या दर्जाच्या चपला वापरायला हव्यात.

३) कामाचे स्वरुप…

सतत उभं राहायचे काम असेल किंवा प्रमाणापेक्षा जास्त चालावे लागत असेल तरी पाय आणि टाचा दुखू शकतात. त्यामुळे आपले कामाचे स्वरुप लक्षात घेऊन त्यानुसार योग्य त्या गोष्टी करणे आवश्यक असते.

उपाय…

1) रात्री झोपताना टाचांना बर्फाने शेकणे हा सर्वात सोपा उपाय आहे. यामुळे टाचेच्या आतल्या स्नायूंना आराम मिळून टाचदुखी काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकते.

२) टाचांना तेलाने मसाज केल्यासही चांगला आराम मिळू शकतो. त्यामुळे टाचांना नियमितपणे शक्य तेव्हा तेल कोमट करुन मसाज करायला हवा. यासाठी मोहरीचं तेल वापरलं तरी चांगला फायदा होतो.

३) गरम पाण्यात मीठ घालून त्यामध्ये टाचा बुडवून ठेवल्यास त्याचाही टाचदुखी कमी होण्यास फायदा होतो.

४) आंबेहळद हा आयुर्वेदातील अतिशय उपयुक्त घटक असून दुखणाऱ्या टाचांना या आंबेहळदीचा लेप लावल्यास त्याचाही चांगला फायदा होतो.

५) आहारात कॅल्शियम, व्हिटॅमिन्स, खनिजे या सगळ्या गोष्टींचे प्रमाण चांगले असेल यासाठी प्रयत्न करा. रात्रीच्या वेळी हलका आहार घेणे, आंबवलेले किंवा आंबट पदार्थ कमी खाणे हाही चांगला उपाय आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

1 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

1 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

1 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

1 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

3 तास ago

आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमार थांबवा; महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…

3 तास ago