दातांचं दुखणं इतकं वेदनादायी असतं की, बोलणं, काही खाणं, काही पिणं सुद्धा जमत नाही. सोबतच झोपही लागत नाही. दात दुखण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. जास्तीत जास्त लोकांना दातांना कीड लागल्यावर त्यात काही फसल्यास वेदना होतात. दातांना कीड लागल्यानं किंवा थंड-गरम काही लागल्यास असह्य वेदना होतात. पोकळ होणाऱ्या दाढींमुळेही वेदना होऊ शकतात. दातांचं दुखणं इतकं जास्त असतं की, औषधं घेऊनही आराम पडत नाही. इतकंच नाही तर दातांच्या दुखण्यामुळे चेहऱ्यावर सूज आणि डोकेदुखीची समस्याही होते. तुम्हाला जर दातांचं तुम्ही काही घरगुती उपाय करून दातांचं दुखणं दूर करू शकता. हे उपाय पूर्वी आपले आजी-आजोबा करायचे कारण त्यावेळी दातांचे इतके दवाखानेही नव्हते. या उपायांनीच त्यांना आराम मिळत होता.
दातांच दुखण दूर करणारे घरगुती उपाय
मिठाचं पाणी
दातांचं दुखणं दूर करण्यासाठी अनेक एक्सपर्ट मिठाच्या पाण्यानं गुरळा करण्याचा सल्ला देतात. कोमट पाण्यात थोडं मीठ टाकून गुरळा करू शकता. यानं वेदना कमी होण्यास मदत मिळू शकते, तसेच दातांमध्ये काही अडकलं असेल तर तेही निघू शकेल. मिठात नॅचरल कीडनाशक तत्व असतात, जे दातांमधील अडकलेल्या कीडेला मारतात आणि सूजही कमी करतात. दिवसातून दोन ते तीन वेळा तुम्ही हा उपाय करू शकता.
लवंग
दाताचं दुखणं दूर करण्यासाठी लवंग खूप फायदेशीर मानली जाते. दात दुखत असेल तर दाताखाली १ लवंग दाबून धरा. लवंग हलकी दाबल्यास दुखण्यापासून आराम मिळू शकतो. हवं तर तुम्ही लवंगाचं तेल रूईला लावून दातावर लावून ठेवू शकता. यानंही तुम्हाला आराम मिळू शकेल.
लसूण
दातांच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही लसूण वापरू शकता. लसणाची कळी चावून खाल्ल्यास दाताच्या दुखण्यापासून आराम मिळू शकतो. लसणामध्ये अॅलिसिन नावाचं तत्व असतं, जे वेदना कमी करण्यास मदत करू शकत.
हळद
हळदीमध्ये नॅचरल अॅंटी-बायोटिक तत्व असतात. दातांचं दुखणं बंद करण्यासाठी हळद, मीठ आणि मोहरीच्या तेलाची पेस्ट तयार करा. ही पेस्ट वेदना होत असलेल्या जागी काही वेळ लावून ठेवा. काही वेळात तुम्हाला वेदनेपासून आराम मिळू शकतो.
बेकिंग सोडा
वेगवेगळ्या कामांसाठी उपयोगात येणारा बेकिंग सोडा दाताचं दुखणं दूर करण्यासाठीही फायदेशीर ठरतो. हा उपाय करण्यासाठी एक रूईचा बोळा पाण्यात भिजवा आणि नंतर पिळून घ्या. यावर थोडा बेकिंग सोडा लावा आणि वेदना होत असलेल्या ठिकाणी लावा. यानं आराम मिळू शकतो.
(सोशल मीडियावरून साभार)
नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…
शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…
सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…
रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला…
मुंबई: राजकारणाच्या मैदानात कधी तलवारी चालतात, कधी घोषणांचा पाऊस पडतो; पण महाराष्ट्रात आता सरकारी जाहिरातींच्या…