सध्या पावसाचे दिवस सुरु झाले आहेत. अनेकदा आपण पावसात भिजतो. पावसाळा म्हणजे दमट हवामान, सतत होणारा पाऊस आणि वातावरणात वाढलेली आर्द्रता या सगळ्यामुळे वातावरणात अनेक बदल होतात. पावसाळ्यात वारंवार होणाऱ्या या वातावरणातील बदलांमुळे आपल्याला अनेक आजार व संसर्ग अगदी पटकन होतो. पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. विशेषतः कोरडा खोकला ही एक फारच कॉमन पण त्रासदायक समस्या असते, कारण कोरडा खोकला झाल्यास घसा सतत खवखवत राहतो.
कोरडा खोकला येऊन घसा सारखा खवखवत असेल तर दिवसभर कामात लक्ष लागत नाही तसेच झोपही व्यवस्थित येत नाही. हा कोरडा खोकला एकदा झाला की जायचे नावच घेत नाही. कोरडा खोकला बराच दीर्घकाळ काळ टिकतो आणि सतत खोकून घसा दुखतो, खवखवतो व साधे बोलणेही त्रासदायक होते. काहीवेळा तर औषध घेतल्यानंतरही बरेच दिवस हा खोकला जात नाही आणि त्यामुळे थकवा व अस्वस्थ वाटते. पावसाळ्यात आपल्यापैकी बऱ्याचजणांना असा कोरडा खोकला होतो. कोरडा खोकला टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी आणि घरच्या घरी कोणते उपाय करून आराम मिळवता येईल ते पाहूयात.
कोरड्या खोकल्यावर करा असरदार घरगुती उपाय
कोरड्या खोकल्यावर घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला नागवेलीची ३ ते ४ पानं, आल्याचा छोटा तुकडा, १ टेबलस्पून मध, चिमूटभर काळीमिरी पूड, एक स्वच्छ सुती कापड इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
आता नेमकं करायचं काय
सगळ्यांत आधी नागवेलीची ३ ते ४ पाने स्वच्छ धुवून घ्यावीत. मग या पानांचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. आता एका खलबत्त्यात नागवेलींच्या पानांचे तुकडे व आल्याचा छोटा तुकडा घेऊन हे दोन्ही पदार्थ एकत्रित कुटून बारीक करून घ्यावेत. त्यानंतर एका स्वच्छ सुती कापडात ही खलबत्त्यातील पेस्ट घालूंन हाताने हलकेच दाबून त्याचा रस एका बाऊलमध्ये काढून घ्यावा. त्यानंतर या रसात १ टेबलस्पून मध व चिमूटभर काळीमिरी पूड मिसळून घ्यावी. कोरड्या खोकल्यासाठी आपले घरगुती सिरप पिण्यासाठी तयार आहे. रोज सकाळी उपाशीपोटी १ टेबलस्पून हे नागवेलींच्या पानांचे सिरप प्यायल्यास कोरड्या खोकल्याची समस्या कमी होण्यास मदत होते. याचबरोबर, सतत खोकून घसा दुखत असेल तर, या उपायाने घशाला आराम मिळतो.
नागवेलीच्या पानांचे घरगुती सिरप पिण्याचे फायदे
१) नागवेलीची पान: श्वसनमार्ग मोकळा करुन कोरड्या खोकल्याचा त्रास कमी करण्यास फायदेशीर ठरते.
२) आल: आल्याचा तुकडा घशाची खवखव आणि जळजळ कमी करतो.
३) मध: मध वारंवार खोकून थकलेल्या घशाला आराम देतो आणि खोकल्याची तीव्रता कमी करतो.
4) काळीमिरी पूड: काळीमिरी पूड जंतुसंसर्ग कमी करून प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
(सोशल मीडियावरून साभार)
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…