आरोग्य

उन्हाळ्यात केसांना तेल लावणं कितपत योग्य? तुम्हीही या दिवसांत डोक्याला मालिश करत असाल तर…

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. पंखा, कुलर असूनही अंगातून, डोक्यातून घामाच्या धारा येत असतात. एसीच्या गारेगार हवेत तेवढ्यापुरतं बरं वाटतं. पण आपण काही २४ तास एसीमध्ये बसू शकत नाही. त्यामुळे खूप घाम येऊन या दिवसांत आपलं डोकं बऱ्याचदा ओलंच राहतं. अशा ओलसर, घामट झालेल्या केसांना तेल लावणं कितपत योग्य आहे, त्याचा खरंच या दिवसांत केसांना फायदा होऊ शकतो का या दिवसांत डोक्याला तेल लावायचंच असेल तर ते कोणतं आणि कशा पद्धतीने लावाव.

उन्हाळ्यात केसांना तेल लावणं योग्य आहे का

या उन्हाळ्याच्या घामट दिवसांमध्ये डोक्याला तेल लावायचं असेल तर बदाम तेल, ऑलिव्ह ऑईल, कॅस्टर ऑईल असं कोणतंही घट्ट तेल वापरू नका. या दिवसांत अतिशय हलक्या आणि केसांना खूप चिकटून न राहणाऱ्या तेलाचा वापर करावा.

कारण चिकट तेलामुळे आधीच घामट झालेले केस आणि डोक्याची त्वचा आणखीनच खराब होते. त्यामध्ये धूळ, घाण चिटकून बसते. यामुळे मग डोक्याच्या त्वचेचे ओपन पोअर्स बंद होऊन कोंड्याचे प्रमाण वाढणे, डोक्यात फोड येणे, खाज येणे असे त्रास सुरू होतात. त्यामुळे या दिवसांत केसांना आर्गन ऑईल, खोबरेल तेल लावून मालिश करणं अधिक योग्य. तसेच तेल नेहमीपेक्षा थोडे कमी प्रमाणात घेतले तरी चालेल. डोक्यातल्या ओलसरपणामुळे आणि सततच्या घामामुळे केसांची मुळं आधीच नाजुक झालेली असतात. त्यामुळे तेल लावताना खूप जोरात चोळू नका. बोटाच्या टोकांनी हळूवारपणे गोलाकार फिरवत डोक्याला मसाज करा. तसेच केस धुण्याच्या एक ते दोन तास आधीच केसांना तेल लावून ठेवा. तेल लावल्यानंतर कडक उन्हामध्ये बाहेर जाणे टाळा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

15 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

18 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

1 दिवस ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

2 दिवस ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

2 दिवस ago