आरोग्य

उन्हाळ्यात केसांना तेल लावणं कितपत योग्य? तुम्हीही या दिवसांत डोक्याला मालिश करत असाल तर…

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. पंखा, कुलर असूनही अंगातून, डोक्यातून घामाच्या धारा येत असतात. एसीच्या गारेगार हवेत तेवढ्यापुरतं बरं वाटतं. पण आपण काही २४ तास एसीमध्ये बसू शकत नाही. त्यामुळे खूप घाम येऊन या दिवसांत आपलं डोकं बऱ्याचदा ओलंच राहतं. अशा ओलसर, घामट झालेल्या केसांना तेल लावणं कितपत योग्य आहे, त्याचा खरंच या दिवसांत केसांना फायदा होऊ शकतो का या दिवसांत डोक्याला तेल लावायचंच असेल तर ते कोणतं आणि कशा पद्धतीने लावाव.

उन्हाळ्यात केसांना तेल लावणं योग्य आहे का

या उन्हाळ्याच्या घामट दिवसांमध्ये डोक्याला तेल लावायचं असेल तर बदाम तेल, ऑलिव्ह ऑईल, कॅस्टर ऑईल असं कोणतंही घट्ट तेल वापरू नका. या दिवसांत अतिशय हलक्या आणि केसांना खूप चिकटून न राहणाऱ्या तेलाचा वापर करावा.

कारण चिकट तेलामुळे आधीच घामट झालेले केस आणि डोक्याची त्वचा आणखीनच खराब होते. त्यामध्ये धूळ, घाण चिटकून बसते. यामुळे मग डोक्याच्या त्वचेचे ओपन पोअर्स बंद होऊन कोंड्याचे प्रमाण वाढणे, डोक्यात फोड येणे, खाज येणे असे त्रास सुरू होतात. त्यामुळे या दिवसांत केसांना आर्गन ऑईल, खोबरेल तेल लावून मालिश करणं अधिक योग्य. तसेच तेल नेहमीपेक्षा थोडे कमी प्रमाणात घेतले तरी चालेल. डोक्यातल्या ओलसरपणामुळे आणि सततच्या घामामुळे केसांची मुळं आधीच नाजुक झालेली असतात. त्यामुळे तेल लावताना खूप जोरात चोळू नका. बोटाच्या टोकांनी हळूवारपणे गोलाकार फिरवत डोक्याला मसाज करा. तसेच केस धुण्याच्या एक ते दोन तास आधीच केसांना तेल लावून ठेवा. तेल लावल्यानंतर कडक उन्हामध्ये बाहेर जाणे टाळा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जेजुरी पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेली चिमुकली सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन

संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…

58 मिनिटे ago

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…

2 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

3 तास ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे; उपाध्यक्षपदी सुनिल जिते यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

4 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

4 तास ago

रुद्राक्षाचं पाणी पिण्याचे फायदे

रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…

4 तास ago