आपल्या डेली रुटीनमध्ये ‘झोप’ ही देखील तितकीच महत्वाची असते. फिट राहण्यासाठी चांगली झोप घेणं आवश्यक असते. झोप शरीराच्या प्रत्येक भागाला आराम देते. त्यामुळे शरीर पुढच्या दिवसासाठी तयार होते. झोप शरीरासोबत मन, बुद्धी आणि इंद्रियांनाही ताजेतवाने करते. यामुळेच शरीर पुन्हा नव्याने तयार होते. आपली रात्रीची झोप ठीक झाली नाही तर पुढचा संपूर्ण दिवस आळस अंगात राहतो. जर आपल्या झोपेची पद्धत किंवा वेळ चुकीची असेल तर त्याचा हळुहळु आपल्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम झालेला दिसून येतो.
झोप नीट झाली नाही तर आपल्याला अपचन, गॅस, अॅसिडीटी अशा समस्या उद्भवू शकतात इतकेच नव्हे तर हार्मोनल इम्बॅलेन्सदेखील होऊ शकतो. सध्याच्या काळात झोप न येणं ही एक सर्वसामान्य समस्या बनली आहे. झोपेच्या कमतरतेमुळे मानसिक स्वास्थ्यही बिघडते आणि काहीवेळा त्यामुळे चिंता वाढते. कमी झोपेमुळे डोकेदुखी, थकवा, अंगदुखी, तणाव, चिंता, एकाग्रतेचा अभाव ते रक्तदाबाच्या समस्यांपर्यंतच्या अनेक समस्या वाढतात. अशा परिस्थिती आयुर्वेदानुसार, वात – पित्त – कफ अशा तीन प्रवृत्ती असतात.
शरीराच्या प्रकृतीनुसार कोणी किती तास झोपावे ते पाहा…
वात प्रकृती: वात प्रकृतीच्या व्यक्तींचा बारीक बांधा असतो, तसेच या व्यक्ती अधिक जास्त विचार करतात. वात प्रकृतीच्या व्यक्तींना खरतर अंथरुणात पडल्या – पडल्या झोप येते. परंतु जर एकदा का त्यांची झोपमोड झाली की त्यांना बराचवेळ झोप लागत नाही. वात प्रकृतीच्या व्यक्तींची झोपमोड झाल्यावर त्यांना पुन्हा झोप येणे खूपच अवघड असते. यासाठीच, वात प्रकृती असणाऱ्यांना शांत झोपेची सर्वात जास्त गरज असते त्यामुळे त्यांनी किमान ८ तासांची सलग झोप घेणे गरजेचे असते.
पित्त प्रकृती: पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचा शारीरिक बांधा हा मध्यम असतो, तसेच त्यांना भूक देखील जास्त लागते. तसेच पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना गरजेपुरता बऱ्यापैकी झोप लागते. त्यामुळे त्यांना खूप जास्त झोपेची गरज नसते शरीराला आवश्यक असणारी झोप त्यांना मिळत असते. त्यामुळे त्यांना किमान ७ ते ८ तासांची झोप पुरेशी असते.
कफ प्रकृती: कफ प्रकृतीच्या व्यक्ती या शरीराने स्थूल असतात. त्याच्या शरीरात एक प्रकारचा आळस असतो. या व्यक्ती फारशा अॅक्टिव्ह नसतात. यासाठी या व्यक्तींनी चांगल्या आरोग्यासाठी सतत अॅक्टिव्ह असणे गरजेचे असते. त्यामुळे या कफ प्रकृतीच्या व्यक्तींना ५ ते ६ तासांची झोप पुरेशी असते. कमी झोप घेऊन त्यांनी जास्त अॅक्टिव्ह असणे गरजेचे असते. यामुळे त्यांचे वजन कमी होण्यास देखील अधिक मदत होते.
(सोशल मीडियावरून साभार)
सुरक्षा दलांचे मोठे सर्च ऑपरेशन सुरू; हल्लेखोरांचा शोध सुरू जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील दक्षिण काश्मीरच्या कुलगाम…
स्वतंत्र प्राधिकरण, स्वतंत्र कायदा, २०२७ सिंहस्थासाठी अत्याधुनिक नियोजन; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनाची तयारी मुंबई: सिंहस्थ कुंभमेळा…
२०१९ च्या जनादेशाचा सन्मान, २०२२ मधील राजकीय बदल आणि विकासाभिमुख प्रशासनावर भर मुंबई: २०१९ च्या विधानसभा…
मुंबई: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून बळ देणारे, वंचित-शोषितांच्या वेदनांना शब्द देणारे लोकशाहिर तथा…
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने अजित डोवाल यांचा गौरव; राष्ट्रसुरक्षा, निर्णायक नेतृत्व आणि गुप्तचर व्यवस्थेचे शिंदेंकडून…
एससीईआरटी–ओएलएफ सामंजस्य करार; एआय-आधारित मूल्यमापन, शिक्षक सक्षमीकरण आणि पालक सहभागाला चालना मुंबई: राज्यातील शासकीय शाळांमधील शिक्षणाची…