आरोग्य

पावसाळ्यात साथीच्या रोगांपासून मुलांना दूर कसे ठेवाल

पावसाळा जसा आनंददायी असतो, तसाच तो साथरोगांचा हंगामही असतो. मात्र पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हवेतील जतूंच्या वाढीसाठी पावसाळा पोषक ठरतो आणि त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो.

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, व्हायरल ताप, सर्दी-खोकला, अन्न-विषबाधा यांसारखे अनेक संसर्गजन्य रोग वाढतात. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती प्रौढांपेक्षा कमी असते, त्यामुळे त्यांना या रोगांचा धोका जास्त असतो. त्यामुळे या काळात विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

या साथींच्या रोगांचा धोका: हिवताप, डेंग्यू, झिका, इन्फ्लुएंझा, इन्फ्लुएंझा ए, कावीळ, कॉलरा, टायफॉइड, तीव्र गॅस्ट्रोएन्टेरिटिस, लेप्टोस्पयरोसिस, फंगल इन्फेक्शन यासारखे आजार होऊ शकतात.

पाणी उकळून प्या: पावसाळ्यात दूषित पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे घरी येणारे पाणी उकळून प्यावे. उघड्यावरचे

अन्नपदार्थ ३ खाऊ नका: शक्यतो उघड्यावरील पदार्थ खाऊ नये. कारण याकाळात त्या 3 पदार्थामधून जंतुसंसर्गाची लागण होऊ शकते.

साचलेल्या पाण्यातून जाऊ नका: साचलेल्या पाण्यातून चालण्यास मुलांना मज्जाव करा. कारण त्याद्वारे लेप्टोस्पयरोसिस होण्याची शक्यता असते.

पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या आजारांमुळे ताप येतो. त्याकडे दुर्लक्ष करू नका. घरच्या घरी उपचार न करता डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या, त्यांनी सांगितलेल्या चाचण्या करून आजाराची निदान निश्चित करून घेणे गरजेचे आहे.

पावसाळ्यात साथीचे आजार उद्भवू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. या काळात ताप आल्यास स्वतःच घरच्या घरी उपचार करू नये. डॉक्टरांकडून आजाराचे निदान करून त्यावर वेळीच उपचार करून घेणे गरजेचे आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ठाणे अंतर्गत मेट्रोबाबतचे गैरसमज दूर करा; नागरिकांशी संवाद साधा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत…

11 तास ago

म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने निवृत्त बँक अधिकाऱ्याची 29 लाखांची फसवणूक; शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा

सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…

14 तास ago

आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांबद्दल काकांचा मोठा दावा

'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…

14 तास ago

एफडीएची राज्यभर धडक मोहीम! 88 कारवाया, 9.50 कोटींचा बनावट औषधसाठा जप्त; 10 आरोपी गजाआड

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…

14 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसची ‘मंडल यात्रा’; सरकारला वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…

14 तास ago

‘इथेनॉल घोटाळ्याप्रकरणी नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; मोदींनी देशाची माफी मागावी’; हर्षवर्धन सपकाळ

ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…

14 तास ago