आरोग्य

अंघोळीच्या पाण्यात ‘हा’ घटक असेल तर पडेल टक्कल, वेळीच व्हा सावध…

आजकाल प्रत्येक जण केस गळणे, पांढरे केस, केसात कोंडा यासह इतर समस्यांनी त्रस्त आहे. महिलांसोबतच पुरुष आणि लहान मुलांनाही केसगळतीचा सामना करावा लागत आहे. पाण्यातील वाढलेले खनिजांचे प्रमाण, विशेषतः सल्फेट आणि टीडीएस (एकूण विरघळलेले घन पदार्थ), केसगळतीचे प्रमुख कारण बनत आहे. बोअरवेल किंवा हार्ड वॉटरमुळे केस गळण्याचे प्रमाण वाढल्याने अनेकांना आरोग्याचा त्रास होत आहे.

पाण्याची गुणवत्ता केसांच्या आरोग्यावर थेट परिणाम करते. त्यामुळे योग्य पाण्याचा वापर करून केसगळती थांबवणे आवश्यक आहे. सल्फेट-फ्री उत्पादने वापरा, टाळूची स्वच्छता आणि पोषणाकडे लक्ष द्या, शुद्ध आणि मऊ पाणी वापरा, केस गळती वाढल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

केसगळतीची कारणे कोणती…

केसगळती ही अनेक घटकांवर अवलंबून असते, जसे की आहार, जीवनशैली, आनुवंशिकता, हार्मोनल बदल, ताणतणाव अशा कारणांमुळे केसगळती होते. पाण्याची गुणवत्ता देखील केसगळतीवर परिणाम करू शकते. तरुणपणातच केस गळत असल्याने अनेकांची डोकेदुखी वाढली आहे.

टीडीएस किती हवा…

केसांसाठी वापरण्यायोग्य पाण्यात टीडीएस २०० पीपीएमच्या आत असावा, ३०० पीपीएमपेक्षा जास्त टीडीएस असलेले पाणी त्वचेला कोरडे करू शकते आणि खाज सुटण्याची समस्या उद्भवू शकते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त  शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…

10 तास ago

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

17 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

17 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

17 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

17 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

17 तास ago