आजकाल प्रत्येक जण केस गळणे, पांढरे केस, केसात कोंडा यासह इतर समस्यांनी त्रस्त आहे. महिलांसोबतच पुरुष आणि लहान मुलांनाही केसगळतीचा सामना करावा लागत आहे. पाण्यातील वाढलेले खनिजांचे प्रमाण, विशेषतः सल्फेट आणि टीडीएस (एकूण विरघळलेले घन पदार्थ), केसगळतीचे प्रमुख कारण बनत आहे. बोअरवेल किंवा हार्ड वॉटरमुळे केस गळण्याचे प्रमाण वाढल्याने अनेकांना आरोग्याचा त्रास होत आहे.
पाण्याची गुणवत्ता केसांच्या आरोग्यावर थेट परिणाम करते. त्यामुळे योग्य पाण्याचा वापर करून केसगळती थांबवणे आवश्यक आहे. सल्फेट-फ्री उत्पादने वापरा, टाळूची स्वच्छता आणि पोषणाकडे लक्ष द्या, शुद्ध आणि मऊ पाणी वापरा, केस गळती वाढल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
केसगळतीची कारणे कोणती…
केसगळती ही अनेक घटकांवर अवलंबून असते, जसे की आहार, जीवनशैली, आनुवंशिकता, हार्मोनल बदल, ताणतणाव अशा कारणांमुळे केसगळती होते. पाण्याची गुणवत्ता देखील केसगळतीवर परिणाम करू शकते. तरुणपणातच केस गळत असल्याने अनेकांची डोकेदुखी वाढली आहे.
टीडीएस किती हवा…
केसांसाठी वापरण्यायोग्य पाण्यात टीडीएस २०० पीपीएमच्या आत असावा, ३०० पीपीएमपेक्षा जास्त टीडीएस असलेले पाणी त्वचेला कोरडे करू शकते आणि खाज सुटण्याची समस्या उद्भवू शकते.
(सोशल मीडियावरून साभार)
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…
ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर…
मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
शिरूरमध्ये कामाठीपुरा येथील आश्रमशाळेत खळबळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील कामाठीपुरा…