झोपण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे रात्री. दिवसभरात शरीर थकते, आणि हा थकवा दूर करण्यासाठी आपण रात्री झोपतो. शरीराला ८ तासांची झोप हवीच. ८ तास शरीराला विश्रांती मिळाल्याने दिवसभराचा थकवा तर दूर होतोच. शिवाय सकाळी ताजेतवाने वाटते. पण बऱ्याचदा सकाळी उठल्यानंतर अंग दुखते. किंवा रात्री खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नाही. अपचनामुळे रात्रीची झोपही पूर्ण होत नाही. असे का होते? याचा आपण कधी विचार केला आहे का.
झोपताना आपण कोणत्या पद्धतीने झोपत आहोत, पोझिशन देखील महत्वाची ठरते. कारण बहुतांश लोक चुकीच्या पद्धतीने झोपतात. ज्यामुळे चांगली झोप लागत नाही आणि शरीर तणावाखाली राहते. आरोग्य तज्ज्ञ आणि लेखक प्रशांत देसाई यांनी उत्तम झोपेसाठी बेस्ट पोझिशन याची माहिती दिली आहे. शिवाय झोपताना कोणत्या चुका टाळायला हव्या.
पाठीवर झोपणे चूक
झोपेच्या समस्येवर त्रस्त लोकांवर संशोधन केले असता, झोपेच्या चुकीच्या स्थितीमुळे झोपमोड आणि अंगदुखीचे कारण बनते. जे लोक पाठीवर झोपतात, त्यांना गाढ झोप येत नाही.ज्यामुळे मध्यरात्री अचानक जाग येते आणि झोपमोड होते.
मोठ्याने घोरणे
जे लोक पाठीवर झोपतात, त्यांच्या जबडा आणि घशाच्या स्नायूंवर दबाव येतो. श्वासोच्छवासाच्या नलिकेत अडथळे येऊ शकतात. ज्यामुळे लोक तोंडाद्वारे श्वास घेतात आणि घोरतात. शिवाय स्लीप एपनियाचाही त्रास होतो.
उशी घेऊन झोपणे
या समस्येवर उत्तम उपाय म्हणजे उशी घेऊन झोपणे. उशीमुळे मानेला आणि शरीराला आधार मिळतो. शिवाय श्वासोच्छ्वासाची नळी उघडी राहते. ज्यामुळे झोप चांगली लागते.
साईड पोझिशन बेस्ट
साईड पोझिशनमध्ये झोपल्याने श्वासोच्छवासाच्या नलिकेत अडथळे येत नाही. ज्यामुळे घोरत नाही. त्यामुळे झोपताना नेहमी साईड पोझिशनमध्ये झोपावे.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…