झोपण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे रात्री. दिवसभरात शरीर थकते, आणि हा थकवा दूर करण्यासाठी आपण रात्री झोपतो. शरीराला ८ तासांची झोप हवीच. ८ तास शरीराला विश्रांती मिळाल्याने दिवसभराचा थकवा तर दूर होतोच. शिवाय सकाळी ताजेतवाने वाटते. पण बऱ्याचदा सकाळी उठल्यानंतर अंग दुखते. किंवा रात्री खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नाही. अपचनामुळे रात्रीची झोपही पूर्ण होत नाही. असे का होते? याचा आपण कधी विचार केला आहे का.
झोपताना आपण कोणत्या पद्धतीने झोपत आहोत, पोझिशन देखील महत्वाची ठरते. कारण बहुतांश लोक चुकीच्या पद्धतीने झोपतात. ज्यामुळे चांगली झोप लागत नाही आणि शरीर तणावाखाली राहते. आरोग्य तज्ज्ञ आणि लेखक प्रशांत देसाई यांनी उत्तम झोपेसाठी बेस्ट पोझिशन याची माहिती दिली आहे. शिवाय झोपताना कोणत्या चुका टाळायला हव्या.
पाठीवर झोपणे चूक
झोपेच्या समस्येवर त्रस्त लोकांवर संशोधन केले असता, झोपेच्या चुकीच्या स्थितीमुळे झोपमोड आणि अंगदुखीचे कारण बनते. जे लोक पाठीवर झोपतात, त्यांना गाढ झोप येत नाही.ज्यामुळे मध्यरात्री अचानक जाग येते आणि झोपमोड होते.
मोठ्याने घोरणे
जे लोक पाठीवर झोपतात, त्यांच्या जबडा आणि घशाच्या स्नायूंवर दबाव येतो. श्वासोच्छवासाच्या नलिकेत अडथळे येऊ शकतात. ज्यामुळे लोक तोंडाद्वारे श्वास घेतात आणि घोरतात. शिवाय स्लीप एपनियाचाही त्रास होतो.
उशी घेऊन झोपणे
या समस्येवर उत्तम उपाय म्हणजे उशी घेऊन झोपणे. उशीमुळे मानेला आणि शरीराला आधार मिळतो. शिवाय श्वासोच्छ्वासाची नळी उघडी राहते. ज्यामुळे झोप चांगली लागते.
साईड पोझिशन बेस्ट
साईड पोझिशनमध्ये झोपल्याने श्वासोच्छवासाच्या नलिकेत अडथळे येत नाही. ज्यामुळे घोरत नाही. त्यामुळे झोपताना नेहमी साईड पोझिशनमध्ये झोपावे.
(सोशल मीडियावरून साभार)
नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…
ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…
शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…
मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…
खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…