आरोग्य

फक्त चालून शुगर कमी होते का, डायबिटिस असेल तर नक्की कधी आणि किती चालाव

जगभरात डायबिटीस या आजाराचे रूग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. भारताला डायबिटीसची राजधानी म्हटलं जातं. कारण भारतात या लाइफस्टाईलसंबंधी आजाराचे रूग्ण सगळ्यात जास्त आहेत. हा एक असा आजार आहे जो पूर्णपणे बरा होत नाही. हा आजार केवळ कंट्रोल केला जाऊ शकतो. त्यामुळे शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आहारात बदल करण्यासोबतच वॉक करूनही तुम्ही शुगर नियंत्रित ठेवू शकता.

पायी चालून शुगर कमी होते

डायबिटीसच्या रूग्णांनी अॅक्टिव राहणं फार गरजेचं असतं. शुगर असेल तर अॅक्विट राहून तुम्ही शुगर कंट्रोल करू शकता. सुस्त जीवनशैली डायबिटीसचा धोका अधिक वाढवते. मुळात डायबिटीसचे रूग्ण जेवढं जास्त चालतील तेवढी त्यांची शुगर लेव्हल कमी होते.

पायी चालण्याचा कसा पडतो प्रभाव

वेगानं चालल्यास पॅनक्रियाजचे सेल्स वेगानं कमी होण्यास मदत मिळते. या पद्धतीनं शुगर मेटाबॉलिज्म बूस्ट करते आणि अन्नातून शुगर लवकर पचवून रक्तात याचं प्रमाण वाढण्यापासून रोखता येते. पायी चालल्यानं नेहमीच तुमची शुगर कंट्रोल करण्यास मदत मिळते.

डायबिटीसमध्ये किती पायी चालाव

अमेरिकन डायबिटीस असोसिएशननुसार, रोज किमान १० हजार पावलं किंवा कमीत कमी ३० मिनिटं पायी चालायला हवं. यानं तुमची शुगर लेव्हल कंट्रोल होते. जर तुम्हाला एकदम ३० मिनिटं चालणं अवघड जात असेल तर सकाळी, दुपारी आणि सायंकाळी चालण्याचा वेळ विभागून घ्या. तसेच डाएटमध्येही बदल करा. कार्ब्स पचवण्यासाठी जास्त चालण्याची गरज असते. पायी चालताना स्पीड एकसारखा असणं फार गरजेचं असतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

1 तास ago

ऑपरेशन टायगर! उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का? सहा खासदारांच्या फुटीची चर्चा, ओमराजे निंबाळकर दिल्लीत

दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील…

1 तास ago

कौटुंबिक वादातून पोलिस शिपायाची आत्महत्या

चंदगड: नागरदळे (ता. चंदगड) येथे मीरा-भाईंदर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलिस शिपाई दयानंद कृष्णा पाटील (वय…

1 तास ago

एकल पाल्य विद्यार्थ्यांसाठी विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA) यांच्या वतीने राज्यातील एकल पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना सहाय्य,…

3 तास ago

शाळा-महाविद्यालयांच्या दारातच नशेचा बाजार; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम…

20 तास ago

दरडग्रस्त भागांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे…

22 तास ago