आरोग्य

फक्त चालून शुगर कमी होते का, डायबिटिस असेल तर नक्की कधी आणि किती चालाव

जगभरात डायबिटीस या आजाराचे रूग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. भारताला डायबिटीसची राजधानी म्हटलं जातं. कारण भारतात या लाइफस्टाईलसंबंधी आजाराचे रूग्ण सगळ्यात जास्त आहेत. हा एक असा आजार आहे जो पूर्णपणे बरा होत नाही. हा आजार केवळ कंट्रोल केला जाऊ शकतो. त्यामुळे शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आहारात बदल करण्यासोबतच वॉक करूनही तुम्ही शुगर नियंत्रित ठेवू शकता.

पायी चालून शुगर कमी होते

डायबिटीसच्या रूग्णांनी अॅक्टिव राहणं फार गरजेचं असतं. शुगर असेल तर अॅक्विट राहून तुम्ही शुगर कंट्रोल करू शकता. सुस्त जीवनशैली डायबिटीसचा धोका अधिक वाढवते. मुळात डायबिटीसचे रूग्ण जेवढं जास्त चालतील तेवढी त्यांची शुगर लेव्हल कमी होते.

पायी चालण्याचा कसा पडतो प्रभाव

वेगानं चालल्यास पॅनक्रियाजचे सेल्स वेगानं कमी होण्यास मदत मिळते. या पद्धतीनं शुगर मेटाबॉलिज्म बूस्ट करते आणि अन्नातून शुगर लवकर पचवून रक्तात याचं प्रमाण वाढण्यापासून रोखता येते. पायी चालल्यानं नेहमीच तुमची शुगर कंट्रोल करण्यास मदत मिळते.

डायबिटीसमध्ये किती पायी चालाव

अमेरिकन डायबिटीस असोसिएशननुसार, रोज किमान १० हजार पावलं किंवा कमीत कमी ३० मिनिटं पायी चालायला हवं. यानं तुमची शुगर लेव्हल कंट्रोल होते. जर तुम्हाला एकदम ३० मिनिटं चालणं अवघड जात असेल तर सकाळी, दुपारी आणि सायंकाळी चालण्याचा वेळ विभागून घ्या. तसेच डाएटमध्येही बदल करा. कार्ब्स पचवण्यासाठी जास्त चालण्याची गरज असते. पायी चालताना स्पीड एकसारखा असणं फार गरजेचं असतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

इस्रो–नासा निवड प्रक्रियेत दुहेरी निकषांचा आरोप; समान मेरिटची मागणी, १० ऑगस्टपासून सत्याग्रहाचा इशारा

शिरूर (अरुणकुमार मोटे): इस्रो–नासा विद्यार्थी निवड प्रक्रियेत तालुकानिहाय वेगवेगळे मेरिट निकष लागू करून शिरूरसह अनेक…

5 मिनिटे ago

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

22 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

22 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

1 दिवस ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

1 दिवस ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

1 दिवस ago