आरोग्य

तरुणाईत पक्षाघातात वाढ

भारतातील तरुणांमध्ये सध्या पक्षाघात हा आजार वाढत आहे. लठ्ठपणा, मधुमेह, अतिरिक्त मद्यपान, धूम्रपान ही त्याची प्रमुख कारणे आहेत. याशिवाय ताणतणावाची जीवनशैलीही पक्षाघातासाठी कारणीभूत ठरते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतात पक्षाघात होणाऱ्यांपैकी २० टक्के रुग्ण चाळिशी खालील वयाचे आहेत. हा आजार झालेल्या रुग्णांपैकी ३० टक्के रुग्णांचा मृत्यू होतो, तर ३० टक्के नागरिकांना अपंगत्व येते.

मानवी शरीरात एकाच वेळी एक किंवा अनेक स्नायू कार्य करत नसतील तर अशा स्थितीला पक्षाघात म्हणतात. यात शरीरातील स्नायू लुळे होतात. मेंदूला इजा झाल्यास पक्षाघात होतो. या स्थितीत संवेदी चेतांनाही धक्का पोहोचला तर बाधित भागातील संवेदनाही नाहीशा होतात. बदलत्या जीवनशैलीसह वाईट सवयींमुळे सध्या देशात तरुणांमध्ये पक्षाघाताचे प्रमाण वाढत आहे. मेंदूतील चेतापेशींना ऑक्सिजन आणि ग्लुकोजचा नियमित पुरवठा होणे आवश्यक असते. काही कारणाने रक्तपुरवठा थांबला तर चेतापेशींचे कार्य थांबते. अशा चेतापेशी ज्या अवयवाचे किंवा स्नायूंचे नियंत्रण करतात, त्या अवयवांच्या हालचालींवर परिणाम होतो आणि पक्षाघात होतो. काही वेळा अचानक रक्तदाब वाढल्यास मेंदू मधील रक्तधमनीत गळती होऊन अंतर्गत रक्तस्राव होतो. त्यामुळे चेतापेशींवरील दाब वाढून पक्षाघात होतो. मज्जारज्जू आणि मेंदू यांना जोडणाऱ्या भागामध्ये रक्तस्राव झाल्यास पक्षाघाता बरोबर मृत्यूही ओढवतो.

पक्षाघाताचा झटका आल्यावर पहिले तीन ते चार तास अत्यंत महत्त्वाचे असतात. या काळात मेंदू मधील गाठ विरघळण्यासाठी योग्य औषधोपचार केल्यास बहुतांश रुग्णांमधील मेंदूचे कार्य २४ तासांत सुरळीत होऊ शकते. मात्र त्यासाठी रुग्णाला पक्षाघाताचा झटका आला आहे किंवा मेंदूच्या कोणत्या भागात समस्या उद्भवली आहे ते पाहावे लागते. रुग्णाचे सीटी स्कॅन आणि रक्त तपासण्या केल्यावर त्याच्यावरील उपायांची दिशा निश्चित केली जाते. या काळात उपचार करण्यात आले नाहीत तर मात्र पक्षाघातामुळे शरीराचा लुळा पडलेला भाग योग्य पद्धतीने काम करण्यासाठी चार ते सहा महिनेही लागतात व त्यानंतरही मेंदू पूर्ण क्षमतेने काम करण्याची शक्यता कमी असते.

मेंदूचे शरीराच्या विविध भागांवर नियंत्रण असते. मेंदू मधील कोणत्या भागात इजा किंवा गाठ झाली त्यावर या व्यक्तीला पक्षाघातामुळे होणारी लक्षणे अवलंबून असतात. पक्षाघातामुळे या व्यक्तीची हालचाल, संवादातील समन्वय, शरीराअंतर्गत अवयवातील समन्वय आदी पैकी एक किंवा अनेक क्रियांवर परिणाम होऊ शकतो. काही वेळा हातपाय लुळे पडणे, बोलताना जीभ अडखळणे, तोल जाणे, चेहऱ्याला वाक येणे आदी अशी लक्षणे दिसू शकतात. उच्च रक्तदाब, धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा, तंबाखूचे व्यसन, व्यायामाचा अभाव यामुळे पक्षाघात होऊ शकतो. हा होतो. रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात ठेवून या वाईट सवयी सुधारल्यास धोका टळू शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…

9 तास ago

मुंबई युवक काँग्रेसचा SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न; ‘गिग वर्कर्स न्याय अभियान’ पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…

9 तास ago

मोदींच्या भाषणावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल; महिला आरक्षणावर भाजपवर ‘इव्हेंटबाजी’चा आरोप

नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…

9 तास ago

महिला आरक्षण विधेयकावरून देशात राजकीय गदारोळ

मुंबई: महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जोरदार मालिका…

9 तास ago

वाघाळे येथे अक्षय तृतीयेनिमित्त कृषी पूजनाने संस्कृतीचा जागर; बैलगाडीची भव्य शोभायात्रा…

शिरूर : शिरूर तालुक्यातील वाघाळे येथे १९ तारखेला पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या प्रेरणेतून कार्यरत स्वाध्याय…

12 तास ago

वाघोलीत घडली हृदयद्रावक घटना; उच्चशिक्षित महिलेने संपवलं आयुष्य…

वाघोली : वाघोलीतील 'रविनंदा कॉयलाईट' सोसायटीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. माहेरहून १० लाख रुपये…

12 तास ago