मध्यरात्री खाणे ही आजकाल सामान्य सवय दिसू लागली आहे, पण ही सवय चांगली नाही. रात्रीच्या जेवणाच्या आणि सकाळच्या नाष्ट्याच्या वेळेत खूप अंतर असते, पण म्हणून मध्यरात्री उठून खाणे योग्य नाही व ते टाळले पाहिजे. मध्यरात्री खाण्यासाठी आपण नेहमी फ्रिज मध्ये काही मिळते का बघतो जे आपण पटकन खाऊ शकतो आणि ज्यानी आपली भूक पण भागू शकेल. असे करताना हमखास शिल्लक राहिलेले किंवा शिळे पदार्थ खातो किंवा काही तरी गोड पदार्थ जे कायम फ्रिज मध्ये ठेवलेले असते असे खातो.
ज्यांना रात्री झोप लागत नाही अशा लोकांना मध्यरात्री भूक लागते आणि अशा वेळी जंक फूड खाण्याकडे कल जास्ती असतो. हे असे धोकादायक खाण्यामुळे वजन आणि लठ्ठपणा वाढतो. अपूर्ण झोपेमुळे जंक फूड खाण्याची भूक वाढते आणि अशा धोकादायक आणि अवेळी खाण्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि असे अजून शारिरीक आजार निर्माण होतात.
मध्यरात्री खाणे टाळण्याचे मार्ग
रात्रीचे जेवण झाले की साधारण अर्ध्या तासाने दात घासा. दात घासून झाल्यावर काही खाण्याची इच्छा होत नाही, कारण नंतर परत दात घासायचा कंटाळा येतो.
जर वेळेवर झोप लागत नसेल, तर मोबाईल, टीव्ही, संगणक, लॅपटॉप यासारख्या स्क्रिन्स पासून झोपण्यापूर्वी किमान एक तास लांब राहावे. अशा स्क्रीन्स मधून येणाऱ्या किरणांमुळे झोप लागत नाही.
अगदी थोडे पाणी प्या. बऱ्याच वेळा आपण आपली भूक पाणी पिऊन देखील शमवू शकतो.
शक्यतो अशी भूक मानसिक असते. कटाक्षाने खाणे टाळा. प्रयत्नपूर्वक काहीही न खाण्याची सवय लावा. सवय लागतेच.
आयुष्यातील ताण कमी करा. यासाठी ध्यानधारणा, प्राणायाम आणि श्वसनाचे व्यायाम प्रकार करा. यामुळे रात्री शांत झोप लागेल.
दिवसा व्यवस्थितपणे खाल्याने, अवेळी खाण्याची इच्छा होणार नाही. सकाळचे आणि रात्रीच्या जेवणाची वेळ, जेवण कधीही चुकवू नका.
(सोशल मीडियावरून साभार)
पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…
नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…
मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…
मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…