मध्यरात्री खाणे ही आजकाल सामान्य सवय दिसू लागली आहे, पण ही सवय चांगली नाही. रात्रीच्या जेवणाच्या आणि सकाळच्या नाष्ट्याच्या वेळेत खूप अंतर असते, पण म्हणून मध्यरात्री उठून खाणे योग्य नाही व ते टाळले पाहिजे. मध्यरात्री खाण्यासाठी आपण नेहमी फ्रिज मध्ये काही मिळते का बघतो जे आपण पटकन खाऊ शकतो आणि ज्यानी आपली भूक पण भागू शकेल. असे करताना हमखास शिल्लक राहिलेले किंवा शिळे पदार्थ खातो किंवा काही तरी गोड पदार्थ जे कायम फ्रिज मध्ये ठेवलेले असते असे खातो.
ज्यांना रात्री झोप लागत नाही अशा लोकांना मध्यरात्री भूक लागते आणि अशा वेळी जंक फूड खाण्याकडे कल जास्ती असतो. हे असे धोकादायक खाण्यामुळे वजन आणि लठ्ठपणा वाढतो. अपूर्ण झोपेमुळे जंक फूड खाण्याची भूक वाढते आणि अशा धोकादायक आणि अवेळी खाण्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि असे अजून शारिरीक आजार निर्माण होतात.
मध्यरात्री खाणे टाळण्याचे मार्ग
रात्रीचे जेवण झाले की साधारण अर्ध्या तासाने दात घासा. दात घासून झाल्यावर काही खाण्याची इच्छा होत नाही, कारण नंतर परत दात घासायचा कंटाळा येतो.
जर वेळेवर झोप लागत नसेल, तर मोबाईल, टीव्ही, संगणक, लॅपटॉप यासारख्या स्क्रिन्स पासून झोपण्यापूर्वी किमान एक तास लांब राहावे. अशा स्क्रीन्स मधून येणाऱ्या किरणांमुळे झोप लागत नाही.
अगदी थोडे पाणी प्या. बऱ्याच वेळा आपण आपली भूक पाणी पिऊन देखील शमवू शकतो.
शक्यतो अशी भूक मानसिक असते. कटाक्षाने खाणे टाळा. प्रयत्नपूर्वक काहीही न खाण्याची सवय लावा. सवय लागतेच.
आयुष्यातील ताण कमी करा. यासाठी ध्यानधारणा, प्राणायाम आणि श्वसनाचे व्यायाम प्रकार करा. यामुळे रात्री शांत झोप लागेल.
दिवसा व्यवस्थितपणे खाल्याने, अवेळी खाण्याची इच्छा होणार नाही. सकाळचे आणि रात्रीच्या जेवणाची वेळ, जेवण कधीही चुकवू नका.
(सोशल मीडियावरून साभार)
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिक्रापूर परिसरात सोशल मीडियावर खोटी ओळख निर्माण करून एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या…
मुंबई: चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये वाढत चाललेल्या हत्ती–मानव संघर्षाचा गंभीर प्रश्न काँग्रेस विधानमंडळ पक्षनेते विजय…
मुंबई: विधानसभेत हाफकिन संस्थेच्या भवितव्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला…
मुंबई: अभिव्यक्ती स्वातंत्र्य, नागरिकांचे घटनात्मक अधिकार आणि हद्दपारीच्या कारवाईसंदर्भात उच्च न्यायालयाने केलेल्या निरीक्षणांची राज्याच्या राजकीय…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी राज्य सरकारने शाळांच्या ५०० मीटर परिसरात 'स्टिंग'सारख्या उच्च कॅफिनयुक्त एनर्जी ड्रिंक्सच्या…
मुंबई : निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून योजना जाहीर करायच्या आणि नंतर कोणतेही ठोस कारण न देता…