आरोग्य

काही लोकांसाठी भेंडीची भाजी खाणं ठरू शकतं नुकसानकारक

लहान मुले असो वा घरातील मोठ्या व्यक्ती सगळेच आवडीने भेंडीची भाजी खातात. भेंडीची भाजी चवीला तर चांगली लागतेच सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. भेंडीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. जसे की, व्हिटॅमिन, फायबर, कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम आणि फॉस्फोरस असतात.

भेंडीच्या भाजीमध्ये अनेक पोषक तत्व असले आणि त्यांचे शरीराला अनेक फायदे होत असले तरी काही लोकांसाठी भेंडी नुकसान कारक ठरू शकते. असे काही आजार असतात ज्या दरम्यान भेंडी खाणं घातक ठरू शकतं. अशात कुणी भेंडीची भाजी खाऊ नये हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कुणी खाऊ नये भेंडी

एलर्जी असलेल्यांनी

जर तुम्हाला भेंडीच्या भाजीची एलर्जी असेल तर याचं सेवन करणं बंद करा. भेंडी खाल्ल्यानंतर तुम्हाला पुरळ, खाज, सूज किंवा श्वास घेण्यास त्रास, पोटात वेदना अशा समस्या होऊ शकतात.

पचनासंबंधी समस्या असल्यास 

जर तुम्हाला आधीच बद्धकोष्ठता, जुलाब किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोम सारख्या पचनासंबंधी समस्या असेल तर भेंडी खाल्ल्याने तुमची समस्या वाढू शकते.

डायबिटीस असेल तर

भेंडीमध्ये ब्लड शुगर कमी करणारे गुण असतात. त्यामुळे तुम्ही जर डायबिटीसचं औषध घेत असाल तर भेंडी खाण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

किडनी स्टोन

किडनी स्टोन झालेल्यांनी भेंडीची भाजी खाऊ नये. कारण यात भरपूर ऑक्सलेट असतं. ज्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका अधिक वाढतो. जर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल तर भेंडीची भाजी खाऊ नये.

गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या

भेंडीमध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं. ज्यामुळे काही लोकांमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या होऊ शकतात. जशा की, पोटात गॅस होणे, पोट फुगणे आणि अपचन. त्यामुळे अशा समस्या असलेल्या लोकांनी भेंडीची भाजी अजिबात खाऊ नये.

हाय ब्लड प्रेशर

हाय ब्लड प्रेशर असलेल्या रूग्णांनी पोटॅशिअम असलेले पदार्थ कमी खाल्ले पाहिजेत. भेंडीमध्ये भरपूर पोटॅशिअम असतं. ज्यामुळे ब्लड प्रेशर आणखी वाढू शकतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राम कदमांचा नैतिकतेचा आव; ‘दुसऱ्याला सांगे ज्ञान, स्वतः कोरडे पाषाण’; अमोल मातेले

मुंबई : भाजपचे आमदार राम कदम यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर हक्कभंगाची भाषा करून नैतिकतेचा…

1 तास ago

या ९ कारणांमुळे झोपेतून उठल्यावर सगळ्यात आधी प्यावं पाणी

रोज भरपूर पाणी पिणं आपल्या शरीरासाठी फार महत्वाचं असतं. कारण याने पचन तंत्र, ब्लड सर्कुलेशन,…

2 तास ago

ध्यान म्हणजे काय

ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे.त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो. ध्यानाची पध्दत…

3 तास ago

जालिंदर कामठे यांच्या निधनाने राष्ट्रवादीचा निष्ठावान सहकारी हरपला; सुनेत्रा पवार

पुणे: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी…

3 तास ago

शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यावर महायुती सरकार ठाम; एकनाथ शिंदे

माळशिरस येथे जाहीर पक्षप्रवेश; विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचाही शिवसेनेत प्रवेश मुंबई: महायुती सरकारच्या विकासाभिमुख…

3 तास ago

रांजणगाव पोलिसांची संवेदशीलता; जबरी चोरीनंतर अपघाती मृत्यू झालेल्या महिलेला दिला न्याय

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव परिसरात भंगार गोळा करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेवर चाकूचा धाक दाखवत…

17 तास ago