महाराष्ट्र

धर्मवीर आनंद दिघे अर्थसहाय्य योजना तात्काळ सुरू करा; सरकारवर अस्लम शेख यांचा निशाणा

मुंबई : निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून योजना जाहीर करायच्या आणि नंतर कोणतेही ठोस कारण न देता त्या बंद करायच्या, हा सरकारचा कारभार निषेधार्ह असल्याची टीका काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी विधानसभेत केली. म.वि.स. नियम २९३ अंतर्गत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी ‘धर्मवीर आनंद दिघे अर्थसहाय्य योजना’ तात्काळ पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.

आ. शेख म्हणाले की, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये दिव्यांग नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत ४० ते ८० टक्के दिव्यांग लाभार्थ्यांना दर सहा महिन्यांनी ₹६,०००, तर ८१ ते १०० टक्के दिव्यांग लाभार्थ्यांना ₹१८,००० अर्थसहाय्य देण्यात आले. मात्र, त्याच आर्थिक वर्षात केवळ एकच हप्ता वितरित करून योजना बंद करण्यात आली. त्यानंतर आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये एकाही दिव्यांग लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला.

याहून गंभीर बाब म्हणजे आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नसल्याने हजारो दिव्यांग बांधवांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्याचे त्यांनी नमूद केले.

पालिकेकडून माहिती घेतल्यानंतर या योजनेला आवश्यक प्रशासकीय मंजुरीच नसल्याचे समोर आले आहे. मग मंजुरी नसताना योजना सुरू करण्याचा निर्णय कोणी घेतला? ही योजना केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जाहीर करण्यात आली होती का? असा सवालही आ. शेख यांनी सरकारला केला.

दिव्यांग नागरिकांना दिलेले आश्वासन सरकारने पाळावे, ‘धर्मवीर आनंद दिघे अर्थसहाय्य योजना’ तात्काळ पूर्ववत सुरू करावी, नियमित निधीची तरतूद करावी आणि सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आ. अस्लम शेख यांनी सभागृहात केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील कोंडीने उद्योगांना स्थलांतराची भीती; मुख्यमंत्र्यांकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

कोरेगाव भीमा : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीचा गंभीर फटका सणसवाडी, कोरेगाव भीमा आणि रांजणगाव…

2 तास ago

पांढरेशुभ्र नारळाचे दूध असते एकदम पौष्टिक, त्वचाविकार ते पित्त सगळ्यावर रामबाण

काही पारंपरिक पदार्थ ठराविक सणांना किंवा ठराविक पदार्थांसोबत केले जातात. जसे महाराष्ट्रात फार लोकप्रिय असलेला…

2 तास ago

स्मरणशक्ती वाढवणारे बेस्ट ५ फूड्स, सोबतच आणखी सुधारेल मेंदुचं काम

शरीराला आपलं काम करण्यासाठी आवश्यक पोषक तत्वांची गरज असते. शरीरातील वेगवेगळ्या अवयवांसोबतच मेंदुला सुद्धा पोषक…

2 तास ago

थकवा त्या मागची कारणे व उपाय

थकवा हा शारीरिक किंवा मानसिक स्वरूपाचा असू शकतो. जर सतत थकवा जाणवत असेल तर त्यामागे…

2 तास ago

MMRDA भरती परीक्षेच्या निकालावर काँग्रेसचा आक्षेप; उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी

मुंबई: भाजपा सरकारच्या काळात परीक्षांना पेपरफुटीचे ग्रहण लागले असून सरकार एकही परीक्षा व्यवस्थित घेऊ शकत नाही.…

3 तास ago

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी : मदत कौतुकास्पद, पण निकषांचा पुनर्विचार गरजेचा

मुंबई: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवयव प्रत्यारोपणासाठी शेकडो रुग्णांना कोट्यवधी रुपयांची मदत मिळते, ही निश्चितच…

3 तास ago