आरोग्य

फ्रिजमध्ये ‘हे’ पदार्थ २४ तासांपेक्षा जास्त वेळ ठेवणं पोटासाठी अत्यंत घातक, बिघडेल तब्येत

कोणताही पदार्थ जास्त झाला की सरळ उचलायचा आणि फ्रिजमध्ये ठेवून द्यायचा. नंंतर हळू हळू तो संपवायचा असं जवळपास प्रत्येक घरांतच होतं.

पण काही पदार्थ असे असतात जे २४ तासांपेक्षा जास्त वेळ जर फ्रिजमध्ये ठेवून तुम्ही वापरत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकतात.

यापैकी पहिला पदार्थ आहे सोललेला लसूण

लसूण फ्रिजमध्ये जास्त वेळ ठेवल्यास त्याला मोड आल्यासारखे होते. तो लसूण खाण्यात आला तर श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो.

दुसरा पदार्थ आहे चिरलेला कांदा

चिरलेला कांदा तर फ्रिजमध्ये मुळीच ठेवू नये. तो लगेचच वापरून टाका. कारण कांद्यावर खूप लवकर बॅक्टेरिया बसतात. असा कांदा खाल्ल्याने बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. या इन्फेक्शनमुळे लिव्हर, किडनी खराब होण्याचा धोका असतो. शिवाय रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा कमी होते.

तिसरा पदार्थ आहे आलं…

थोडं थोडं वापरायचं आणि तसंच फ्रिजमध्ये ठेवायचं ही सवय अनेकींना असते. पण असं अर्धवट वापरलेलं आलं फ्रिजमध्ये ठेवू नका. त्यावर जे काही सुक्ष्म कण तयार होतात जे लिव्हरसाठी आणि श्वसननलिकेसाठी घातक ठरू शकतात.

चौथा पदार्थ आहे शिजवलेला भात…

भात २४ तासांपेक्षा जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवून अजिबात खाऊ नका. त्याच्यावर अनेक सुक्ष्म विषारी घटक तयार झालेले असतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त  शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…

4 तास ago

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

11 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

11 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

11 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

11 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

11 तास ago