आरोग्य

काहीही खाताना टोमॅटो केचप मागतात लेकरं! पाहा ‘ही’ सवय आरोग्याचं कसं करते नुकसान

सकाळचा नाश्ता असो वा जेवण करायचं असो आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच टोमॅटो केचप जास्त खातात. लहान मुलांना तर सगळ्याच गोष्टींसोबत टोमॅटो केचप हवं असतं. याची गोड आणि चटकदार टेस्ट मुलांना इतकी आवडती की ते प्रत्येक जेवणासोबत तेच मागतात. पालकांनाही वाटतं की यात टोमॅटो आहे, म्हणून आरोग्यासाठी हे चांगलं असेल.

पण खरी गोष्ट अशी आहे की बाजारात मिळणाऱ्या केचपमध्ये खरे टोमॅटो नसतात, तर त्याऐवजी टोमॅटो प्युरी, रिफाइंड साखर, व्हिनेगर, मीठ आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज यांचं मिश्रण असतं, जे आरोग्यासाठी खासकरून मुलांसाठी, खूप नुकसानकारक आहे. कारण मुलांच्या शरीराची वाढ होत असते आणि अशा पदार्थांमुळे त्यांचा शारीरिक व मानसिक विकास बिघडू शकतो. चला पाहूया, केचप मुलांच्या आरोग्यावर कसा वाईट परिणाम करतो.

जास्त साखर आणि लठ्ठपणा

केचपमध्ये रिफाइंड साखर आणि हाय फ्रक्टोज कॉर्न सिरप मोठ्या प्रमाणात असतो. यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढतो आणि भविष्यात डायबिटीज व हार्मोनल असंतुलनाचा धोका निर्माण होतो.

भूक आणि पोषणावर परिणाम

केचपचा नियमित वापर मुलांच्या पचन तंत्राला प्रभावित करतो. त्यामुळे त्यांना पौष्टिक अन्न बोरिंग वाटू लागतं. हळूहळू ते संतुलित आहारापासून दूर जातात आणि शरीरात जीवनसत्त्वे व खनिजे यांची कमतरता निर्माण होते.

पचनसंस्थेवर परिणाम

मुलांची पचनसंस्था अतिशय संवेदनशील असते. केचपमध्ये असलेले आम्लीय घटक, व्हिनेगर आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज यांमुळे गॅस, अपचन, पोटदुखी आणि अॅसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम

केचपमधील कृत्रिम रंग, टेस्ट आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज मुलांच्या मेंदूवर वाईट परिणाम करू शकतात. त्यामुळे चिडचिड, एकाग्रतेचा अभाव, हायपरॲक्टिव्हिटी आणि वर्तनातील बदल अशा समस्या दिसून येतात.

आजारांचा धोका

लहानपणापासून केचप जास्त खाल्ल्यानं ते शरीरात हळूहळू विषासारखं काम करतं. त्यामुळे पुढे जाऊन हाय ब्लड प्रेशर, फॅटी लिव्हर आणि मेटाबॉलिक सिंड्रोम यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.

फक्त टेस्टसाठी किंवा त्यांनी जेवण करावं म्हणून मुलांना केचप देणं म्हणजे त्यांच्या आरोग्यासोबत तडजोड करणं आहे. त्याऐवजी घरच्या घरी बनवलेली ताजी टोमॅटो चटणी, दही डिप किंवा पुदिन्याची चटणी हे नैसर्गिक आणि आरोग्यदायी पर्याय निवडू शकता. त्यामुळे मुलांना टेस्टही मिळेल आणि आरोग्यही टिकेल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

21 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

21 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

1 दिवस ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

1 दिवस ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

1 दिवस ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

1 दिवस ago