आरोग्य

आंबेहळदीचे अनेक फायदे

रोजच्या वापरातल्या हळदीपेक्षाही औषधी हळदीची एक प्रजाती आहे. ती म्हणजे आंबेहळद. आयुर्वेदात तसेच अनेक भारतीय औषधांसंबंधीच्या पुस्तकांमध्ये आंबेहळदीचा उल्लेख आहे. अनेकांना हळदीची ही प्रजाती माहितीच नाही. पण घरात आंबेहळद असायलाच हवी. ती फार उपयुक्त असते. दिसायला आल्यासारखी असते. किसून वापरता येते उगाळून वापरता येते. उकळूनही वापरता येते. अनेक कमालीचे फायदे आहेत.

१) आंबेहळद म्हणजे त्वचेसाठी वरदानच आहे. आपण त्वचेवरचे डाग जावे किंवा पिंपल्स जावे यासाठी अनेक उपाय करत असतो. पण जर आठवड्यातून दोनदा जरी आंबेहळदीचा लेप चेहर्‍याला लावलात तर इतर उपाय करावेच लागणार नाहीत. ऊन्हामुळे चेहर्‍याची पार वाट लागून जाते. चेहरा अगदीच काळवंडतो. त्यावरही आंबेहळद हा मस्त उपाय आहे. चेहऱ्याचा जो खरा रंग आहे तो पुन्हा दिसायला लागतो.

२) जठराग्नि हा पचनसंस्थेतील एक महत्वाचा भाग आहे. पोटात अन्न गेल्यावर त्याचे रुपांतर ऊर्जेत करण्यासाठी जठराग्नि गरजेचा असतो. ही पचन क्रिया सुरळीत व्हावी यासाठी आंबेहळद फायदेशीर ठरते.

३) अनेकदा रक्त गोठून एखादा अवयव काळा निळा पडतो. ते रक्त तसेच गोठलेले राहिले तर गाठ तयार होऊ शकते. असे होऊ नये म्हणून गोठलेल्या रक्तावर वेळीच उपाय करायला हवे. आंबेहळदीचा लेप गोठलेल्या अवयवावर लावल्याने रक्त सुटते.

४) आहारामध्ये आंबेहळदीचा समावेश करून घ्या. त्याचे लोणचेही तयार केले जाते. ते खाल्ले तरी फायद्याचे ठरेल. इतरी पदार्थांमध्ये वापरा. काढा करून प्या. आंबेहळदीचा वापर केल्याने भूक सुधारते. योग्य तेवढीच भूक लागते.

५) पित्ताचा त्रास असेल तर आंबेहळद घरात असायलाच हवी. आंबेहळद ही उत्तम पित्तशामक आहे. उगाळून पोटाला लावा. काढा करून प्या. पित्ताचा त्रास हळूहळू नाहीसा होईल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

17 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

17 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

17 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

17 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

19 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

19 तास ago