आरोग्य

दंतमंजनाचे अनेक फायदे

दंतमंजनाचे फायदे

तोंडातील लाळग्रंथी द्वारे सतत लाळ पाझरत असते. लाळ ग्रंथींचे स्वास्थ्य संतुलित असेल तर त्यातून स्रवणारी लाळ ही योग्य प्रमाणात पाझरते. लाळ नैसर्गिक क्षारीय स्वरूपाची असते. दंतमंजनामुळे लाळग्रंथीचे स्वास्थ्य सुरक्षित राहते आणि त्यातून निर्माण होणारा लाळ रसही योग्य स्वरूपात पाझरतो. लाळरस पचनास व रोगप्रतिकारशक्‍ती अबाधित राखण्यासाठी अतिशय आवश्यक घटक आहे.

हिरड्यांना मसाज केल्यामुळे हिरड्या मजबूत होतात. हिरड्यांना कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. हिरड्यांचे काही आजार असतील तर ते दंतमंजनामुळे बरे होण्यास मदत होते.

दातांवरील सुरक्षाकवचही सुरक्षित राहून दातांची स्वच्छता राखली जाते.

दंतमंजनात औषधींचा समावेश

दंतमंजन किंचित तुरट, किंचित तिखट, किंचित कडू चवीचे असावे. त्यानुसार त्यामध्ये वनस्पतींचा समावेश करतात. जसे- कडुनिंब, लवंग, त्रिफळा चूर्ण, भीमसेनी कापूर, सैंधव, तुरटी, हळद इत्यादी. त्रिफळा चूर्णात किंचित सैंधव मिसळूनही वापरू शकता.

दातून अर्थात वनस्पतींच्या काडीचा ब्रश तयार करून वापरावा. जसे- बब्बूल, कडुनिंब, आंबा, वड, खदिर (खैर) इत्यादी.

दंतमंजन गोड, खारट, आंबट चवीचे नसावे.

बाजारात दंतमंजन सहज उपलब्ध आहेत, जसे- विको, सनातनचे दंतमंजन, माकडछाप इत्यादी अनेक पर्याय आहेत.

पूर्वी देशी गायी घरोघरी होत्या. गाईची शेणी (गोवरी) जाळून त्या राखेत थोडे सैंधव मिसळून दात घासले जात. आज अनेक गोशाळा गाईच्या शेणाच्या राखेपासून दंतमंजन तयार करत आहेत. तेही बाजारात उपलब्ध आहे.

आपण ज्या भागात राहतो त्या भागातील तेल घेऊन त्यामध्ये थोडेसे सैंधव व हळद मिसळून हिरड्यांना मसाज करू शकता, त्यामुळे हिरड्या मजबूत होतात.

दंतमंजन कसे करावे

दंतमंजनसाठी बोटांचा वापर करावा. अंगठ्याच्या बाजूचे बोट (तर्जनी) सोडून इतर कोणतेही बोट वापरु शकता. तर्जनीमुळे दात व हिरड्यांवर जास्त जोर पडतो. दाब जास्त पडल्याने ईजा होऊ शकते. अशा रितीने लहानपणा पासूनच मुलांना दंतमंजन पावडरचीच सवय लावणे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच अगदी सोपेही आहे. दंतमंजन पावडर मूलांनी गिळली तरी कोणताही अपाय नाही. औषधी वनस्पतीच पोटात जातील. तोंडातील लाळग्रंथी, दात, हिरड्या ह्यांचे स्वास्थ्य सुरक्षित ठेवण्यात दंतमंजन इतका सुरक्षित कोणताही पर्याय नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

10 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

10 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

11 तास ago

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

19 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

19 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

19 तास ago