मुंबई: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार सुभाष चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे काल शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवरांनी सुभाष चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला.
सुभाष चव्हाण यांच्याबद्ल बोलताना प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “सुभाष चव्हाण हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते, त्यांनी आयुष्यभर पक्षासाठी काम केले. कोकणापासून मुंबईपर्यंत अनेक प्रांताध्यक्षांसोबत त्यांनी काम केले. पक्षाचा प्रवास त्यांनी पाहिला व त्यानंतरही पक्षासाठी ते कार्यरत होते व आजही ते पक्षासाठी काम करण्यास इच्छुक होते.
कोणते पद दिले नाही तरीही पूर्णवेळ टिळक भवनला देणार ही त्यांची जिद्द होती. पक्षाचा कार्यकर्ता कसा असावा, हे त्यांच्या बोलण्यातून दिसले. त्यांनी घरात जेवढा वेळ व्यतित केला त्यापेक्षा जास्त वेळ त्यांनी टिळक भवनात घालवला आहे. काँग्रेसचा जगन्नाथाचा हा रथ सुभाष चव्हाण यांच्यासारख्या कार्यकर्त्याच्या घामाचा थेंब टिळक भवनात सांडला आहे म्हणून चालत आहे, अशा शोकभावना हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी व्यक्त करून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थना करतो”. असे म्हटले.
यावेळा गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, ज्य़ेष्ठ नेते हुसेन दलवाई, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव माजी आमदार संजय दत्त, बी.एम संदीप, आमदार भाई जगताप, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, गणेश पाटील, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सुभाष चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी चव्हाण कुटुंबियांसह प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…
ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…
मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…
बारामती : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील बारामती व नांदुरा या दोन…