आरोग्य

कडु लिंबाच्या पानांचे गुणकारी फायदे

कडुलिंबाची केवळ दोन पान तरी दररोज खावी असा सल्ला तुम्ही या आधी देखील नक्कीच ऐकला असेल आणि ते तितकेच खरे देखील आहे. चवीला कडु असलेल्या कडुलिंबाच्या पानांमंध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म आहेत. अनेक प्रकारचे त्वचा रोग, दातांच्या सफाई साठी तसेच इतरही अनेक फायदे कडुलिंबामुळे होतात. आयुर्वेदात कडुलिंबाचे अनेक फायदे सांगितले असून थंडीत कडुलिंब शरीरासाठी फायदेशीर ठरते. साऊथ साईडचे लोक संक्रांती तसेच गुढीपाडवा सणाच्या काळात गुळाच्या पाण्यात कडुलिंब टाकुन काढा बनवतात. चला तर जाणुन घेऊ कडुलिंबाचे फायदे.

पोटातील जंत: पोटांच्या आजारावर कडुलिंबाचा रस अतिशय गुणकारी ठरतो. अती गोड खाल्यास किंवा इतर कारणाने जंत झाल्यास कडुलिंबाच्या रसात मध आणि काळी मिरी घालुन पिल्यास पोटाचे विकार नाहीसे होण्यास मदत होते.

चेहरा: चेहऱ्यावर येणारे फोड किंवा पुरळ यासाठी कडुलिंबाची पान, साल आणि फळ यांच्या एकत्रित मिश्रणाचा लेप लावल्यास चेहरा तजेलदार दिसतो. कारण कडुलिंबामध्ये अँटीसेप्टिक गुण असल्याने त्याचा फायदा होता. मात्र या सगळ्या आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील उत्तम.

कान आणि दात: दात स्वच्छ करण्यासाठी आजही अनेक लोक कडुलिंबाच्या झाडाची काठी वापरतात. यामुळे दात स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत होते. तोंडाला जर दुर्गंधी येत असेत तर त्यापासून सुटका मिळते. तसेच अनेक टुथपेस्टमध्ये देखील कडुलिंब असल्याचे तुम्हाला माहितीच आहे. त्याचबरोबर कडुलिंबाचे तेल कानात टाकल्यास कानात येणारे पाणी किंवा कान दुखण्यापासून आराम मिळतो. कान हा संवेदनशील भाग असल्याने एकदा डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.

केस: कडुनिंबाच्या कडवटपणा मुळे त्याचा जंतु किटाणु मारण्यासाठी उपयोग होतो. केसात कोंडा झाला असेल किंवा उवा झाल्या असतील तर अशावेळी कडुलिंबाचे तेल किंवा अंघोळीच्या पाण्यात उकळुन कडुलिंबाचा पाला टाकणे फायदेशीर ठरते.

त्वचेचे विकार: कडुलिंबातील औषधी गुणधर्मांमुळे संसर्गजन्य त्वच्या रोगावर कडुलिंबाची पाने फायदेशीर ठरतात. अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाणे टाकल्यास फायदा होतो कारण कडुलिंबात किटाणू मारण्याची क्षमता असते. या व्यतिरिक्त कांजण्या किंवा गोवर तसेच देवी सारख्या साथीच्या आजारांच्या वेळी घरगुती उपाय म्हणून कडुलिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाकली जातात. कडुलिंब थंड असल्याने अंथरुणात अंगाखाली अशा वेळी कडुलिंबाची पान ठेवली जातात. डायबिटीस असणाऱ्या लोकांसाठी देखील कडुलिंबाचा रस फायदेशीर ठरतो. तांदळाला किड लागु नये, उंदरांपासून रक्षण करण्यासाठी सुकलेला कडुलिंबाचा पाला टाकला जातो. साठवणुकीच्या धान्यात कडुलिंबाचा पाल टाकल्याने वासाने किडे किंवा उंदीर घुशी त्यापासून दुर राहतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा फायरींग प्रकरणातील दोन मुख्य सराईत आरोपी साताऱ्यातून जेरबंद

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य…

43 मिनिटे ago

जेजुरी पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेली चिमुकली सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन

संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…

2 तास ago

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…

3 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

4 तास ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे तर उपाध्यक्षपदी सुनिल जिते

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

5 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

5 तास ago