थोडं काम केलं की लगेच अशक्तपणा येतो, थकल्यासारखं वाटत अशा तक्रारी अनेकांना जाणवतात. शरीरात रक्ताची कमतरता, हाडांमध्ये वेदना होतात असे त्रास प्रत्येकालाच उद्भवतात. जर तुम्हालाही फार चक्कर येत असतील आणि भूक लागत नसेल तर तुम्हाला कमकुवतपणाचा सामना करावा लागू शकतो. कमी वयातच तुम्हाला कमकुवतपणा, थकवा जाणवत असेल तर आरोग्याच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
शरीर निरोगी राहण्यासाठी ताकद असणं फार महत्वाचे असते. ज्यामुळे तुमची इम्यूनिटी चांगली राहते आणि आजारांशी लढण्याची क्षमता मिळते. जर तुमचं वजन कमी जास्त होत असेल आणि अनेक प्रयत्नांनंतरही वजन कमी होत नसेल तर घाबरण्याचे काही कारण नाही. योग गुरू बाबा रामदेव यांनी शरीराची ताकद वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे थकवा, कमकुवतपणा कमी होईल.
ताकद वाढवण्याचे ड्रिंक कसे तयार करायचे…
दूध, केळी, खजूर, शतावरी पावडर, अश्वगंधा पावडर, पांढरी मुसली, शतावरी पावडर, अश्वगंधा पावडर, सफेद मुसली, काळ्या कौच बिया हे साहित्य लागेल. सगळ्यात आधी एका कपामध्ये दूध घ्या. थंड किंवा गरम कोणतंही दूध तुम्ही घेऊ शकता. दूधात केळी आणि खजूर घालून मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात शतावरी, अश्वगंधा, पांढरी मुसली आणि कौंच बीयांची पावडर घालून एकत्र करा. नियमित हे दूध प्यायल्याने तब्येतीत सुधारणा दिसून येईल.
केळी आणि खजूर…
केळी आणि खजूर ताकद वाढवण्याचं एक उत्तम औषध असल्याचे सांगितले आहे. हे दोन्ही पदार्थ वजन वाढवण्यासाठी आणि रक्ताची कमतरता दूर करण्याासाठी ओळखले जातात. यात व्हिटामीन्स, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांसारखे पोषक तत्व असतात.
खजूरात कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि आयर्न यांसारखी पोषक तत्व असतात. ज्यांचे वजन कमी आहे त्यांच्यासाठी हा घरगुती उपाय परिणामकारक असल्याचे बाबा रामदेव यांनी सांगितले आहे. रोज हे हेल्दी ड्रिंक प्यायल्यान वजन वाढते आणि पर्सनॅलिटीही चांगली राहते. हे ड्रिंक प्यायल्याने अशा लोकांना सगळ्यात जास्त फायदा होतो ज्यांची इम्यूनिटी कमकुवत असते. जर तुम्हीही वारंवार आजारी पडत असाल तर हा उपाय करून पाहा. हे मिश्रण शतावरी पावडर, अश्वगंधा पावडर, सफेद मुसली यांसारक्या पदार्थांनी बनवले जाते. रामदेव बाबांच्यामते हे मिश्रण प्यायल्याने शरीराची ताकद वाढते.
(सोशल मीडियावरून साभार)
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…