आपल्या घराच्या अंगणात उगवणारा कडूलिंब, दिसायला साधा पण आरोग्यासाठी अमूल्य आहे. कडूलिंबाच्या पानांचा ताजा रस हा शरीरातील रक्त शुध्द करण्यासाठी अप्रतिम मानला जातो. हा रस प्यायल्याने शरीरातील साचलेले विषारी घटक सहज बाहेर पडतात आणि रक्त स्वच्छ राहते. रक्त स्वच्छ झालं की त्वचेवरचं नैसर्गिक तेज परत येतं, चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग पुरळ कमी होतात आणि आरोग्य सुधारतं.
कडूलिंबाच्या पानात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात. त्यामुळे हा रस पिण्याने रक्त शुध्द होऊन, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे लहानसहान सर्दी-खोकला, त्वचेचे आजार, आणि पचनाशी संबंधित तक्रारी कमी होतात. रक्त शुद्ध झाल्या नंतर शरीरात ऊर्जा वाढते आणि चेहऱ्यावरचा थकलेला भावही नाहीसा होतो. पचन सुधारण्यासाठी, भूक वाढवण्यासाठी आणि शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्यासाठी कडूलिंबाचा रस फायदेशीर ठरतो. हा एक नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक आहे, ज्याचा परिणाम काही दिवसातच जाणवू लागतो. यामुळे त्वचा आणि केस दोन्हींचे आरोग्य टिकून राहते. कडूलिंबाचा रस नेहमी सकाळी ताजा बनवून घ्यावा आणि तो मर्यादित प्रमाणातच प्यावा. रोज २-३ चमचे रस पुरेसा असतो. जास्त प्रमाणात घेतल्यास शरीराला त्रास होऊ शकतो. हा उपाय आरोग्य टिकवण्यासाठी आणि दीर्घकालीन आजार टाळण्यासाठी उत्तम आहे.
(सोशल मीडियावरून साभार)
नवी दिल्ली : भारताला 2047 पर्यंत विकसित, समृद्ध, सुरक्षित, तंत्रज्ञानसमृद्ध आणि जगाच्या विकासात नेतृत्व करणारी…
‘अभ्यासक्रम सुधारणा नव्हे, वैचारिक ताबा मिळविण्याचा प्रयत्न’; आरएसएस-भाजपशी संबंधित व्यक्तींच्या नियुक्तीचा आरोप मुंबई: इयत्ता ११ वी…
मुंबई: जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे घडलेल्या संतापजनक घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी…
मुंबई : शिवसेनेचे पक्षचिन्ह ‘धनुष्यबाण’ गोठवण्याची मागणी उबाठा गटाने न्यायालयात केल्यानंतर शिवसेनेने सोशल मीडियावर बोचरे…
पुणे: विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’…
मुंबई: विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत असतानाही अनेक शहरांचे बकाल रूप झाले आहे.…