हळदीला आयुर्वेदात फार महत्व आहे. कारण यात अनेक गंभीर समस्या दूर करण्याचे गुण असतात. यामुळेच एक्सपर्ट्स दररोज काही प्रमाणात याचं सेवन करण्यास सांगतात. हळदीचा विषय निघतात एक पिवळ्या रंगाचं पावडर डोळ्यांसमोर येतं. सामान्यपणे सगळ्यांना हेच वाटतं की, हळद की केवळ पिवळ्या रंगाची असते. पण असं नाहीये. हळद काळ्या रंगाची सुद्धा असते आणि या हळदीचेही आरोग्याला अनेक फायदे होतात.
काळ्या हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात अॅंटीऑक्सीडेंट असतात. याचं वैज्ञानिक नाव आहे Curcuma caesia. मणिपूर आणि काही राज्यांमध्ये लोकांसाठी याचं खास महत्व आहे. इथे याच्या मुळापासून तयार केलेल्या पेस्टने जखमा भरणे, साप किंवा विंचू चावल्यावर लावली जाते.
काळ्या हळदीचे फायदे
फार कमी लोकांनाच काळ्या हळदीबाबत माहीत आहे. ही आयुर्वेदातील महत्वाच्या जडीबुटींपैकी एक आहे. यात अनेक प्रकारचे औषधी गुण आढळून येतात. ज्यात अॅंटी फंगल, अॅंटी अस्थमा, अॅंटी ऑक्सीडेंट, एनाल्जेसिक, लोकोमोटर, डिप्रेसेंट, अॅंटी कॉन्वेलसेंट, अॅंटी बॅक्टेरिअल, अॅंटी अल्सर आणि मांसपेशींना आराम देणारा प्रभाव, चिंताजनक आणि सीएनएस डिप्रेशन दूर करणारे गुण प्रामुख्याने आढळतात. ज्याने अनेक आजारांपासून बचाव होतो.
1) फुप्फुसाचा आजार होईल दूर
काळ्या हळदीचा वापर फुप्फुसांची समस्या दूर करण्यासाठी प्रभावी ठरतो. यातील अॅंटी-ऑक्सिडेंट्समुळे ताप, जुना खोकला दूर होतो. यासाठी कोमट पाण्यात काळी हळद टाकून सेवन करावं.
2) मायग्रेनमध्ये मिळतो आराम
मायग्रेनची समस्या जास्तकरून महिलांमध्ये बघायला मिळते. पण हा आजार कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. यात डोक्याच्या मागे एका भागात असह्य वेदना होतात. मायग्रेनने पीडित व्यक्ती मोठा आवाज आणि प्रकाशाने संवेदनशील होते. काळी हळद या समस्येत आराम देऊ शकते. आरामासाठी ताज्या हळदीचा लेप तयार करून कपाळावर लावा.
३) पंचनासंबंधी समस्या होते दूर
काळी हळद गॅस्ट्रिक समस्यांपासून सुटका मिळवून देण्याचं काम करते. अॅसिड रिफ्लक्स, गॅस, सूज, उचकी, अपचन, अल्सर, गॅस्ट्रिक इश्यू आहे. अनेक रूटीन बिघडल्याने आणि खाण्या-पिण्यामुळे ही समस्या होते. यापासून सुटका मिळवण्यासाठी काळ्या हळदीचं योग्य प्रमाणात सेवन पाण्यासोबत करावं.
(सोशल मीडियावरून साभार)
नवी दिल्ली : भारताला 2047 पर्यंत विकसित, समृद्ध, सुरक्षित, तंत्रज्ञानसमृद्ध आणि जगाच्या विकासात नेतृत्व करणारी…
‘अभ्यासक्रम सुधारणा नव्हे, वैचारिक ताबा मिळविण्याचा प्रयत्न’; आरएसएस-भाजपशी संबंधित व्यक्तींच्या नियुक्तीचा आरोप मुंबई: इयत्ता ११ वी…
मुंबई: जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे घडलेल्या संतापजनक घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी…
मुंबई : शिवसेनेचे पक्षचिन्ह ‘धनुष्यबाण’ गोठवण्याची मागणी उबाठा गटाने न्यायालयात केल्यानंतर शिवसेनेने सोशल मीडियावर बोचरे…
पुणे: विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’…
मुंबई: विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत असतानाही अनेक शहरांचे बकाल रूप झाले आहे.…