धावपळीच्या जीवनशैलीमुळे कामाचा वाढता ताण, झोपेची कमतरता आणि बाहेरच्या जंकफूडमुळे आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो.(Bp Problem) इतकेच नाही तर आपण वारंवार चहा आणि कॅफीन प्यायल्याने आपले आरोग्य धोक्यात येते. पुरेशी झोप आणि मानसिक ताण कमी न केल्याने आपल्या शरीरासह मनावर अधिक ताण येतो. पुरेशी झोप न घेतल्याने रक्तदाब वाढतो. आणि हा आजार सायलेंट किलर म्हणून ओळखला जातो.
उच्च रक्तदाब वाढल्यावर हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येऊ शकतो. ज्यामुळे म्हातारपणी डिमेंशियाचा धोका देखील वाढतो. पाच महिलांपैकी जवळजवळ एका महिलेला उच्च रक्तदाबासारख्या गंभीर आजाराने ग्रासले आहे.रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याला पुरेसा आहार आणि योग्य व्यायाम करायला हवा. तसेच दैनंदिन दिनचर्येत काही सवयींचा अवलंब करावा. ज्यामुळे या आजारापासून आपले संरक्षण होईल.
आठवड्याभरात किती तास व्यायाम केल्यास रक्तदाब नियंत्रणात होईल.
वाढत्या वयानुसार उच्च रक्तदाबाचा धोका कमी करायचा असेल तर आपल्याला काही सवयींमध्ये बदल करायला हवा. निरोगी खाण्यासोबतच आपल्याला नियमितपणे व्यायाम करायला हवा. यामुळे इतर आजारांचा धोका कमी होईल. तज्ज्ञांच्या मते जर एखाद्या व्यक्तीने त्यांच्या प्रौढत्वाच्या सुरुवातीच्या काळात आठवड्यातून किमान पाच तास हलका व्यायाम केला तर उच्च रक्तदाबाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.
आठवड्यातून सुमारे ५ तास व्यायाम, ज्यामध्ये आपण काही एरोबिक प्रकारांचा समावेश करु शकतो. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहिल. व्यायाम केल्यामुळे आपले हृदय मजबूत होते. ज्यामुळे हृदयाला पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा होतो. रक्तवाहिन्यांना पुरेशा प्रमाणात रक्त मिळाले नाही की, रक्तदाब कमी जास्त होतो. नियमित व्यायाम देखील वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब वाढतो. त्यासाठी वजन देखील नियंत्रणात असणे गरजेचे आहे.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…