आरोग्य

कावीळ कोणतीही आणि कितीही जुनी का असेना, हा घरगुती उपाय करा 3 दिवसात बरी होईल

हा आजार होण्याचे कारण दुषित भोजन केल्यामुळे आणि दुषित पाणी पिण्यामुळे होतो. हा आजार जास्त तेलकट पदार्थ तसेच शिळे अन्न केल्यामुळे, या आजारात रुग्णाच्या शरीरात रक्ताची कमी होते. शरीरामध्ये रक्ताची कमतरता झाल्यामुळे रुग्णाचे पूर्ण शरीर पिवळे दिसायला लागते. या रोगा मध्ये रुग्णाचे डोळे पिवळे पडतात आणि लघवीला पण पिवळी होते. या आजारात रक्तामध्ये दुषित द्रव मिक्स होऊन अनेक प्रकारचे आजार उत्पन्न करतात. यामध्ये लिवर सुजणे आणि भूक कमी लागणे या समस्या होतात.

कावीळ म्हणजे ज्याला हिंदी मध्ये पिलिया म्हणतात, हा आजार लीवरच्या संबंधातील आजार आहे. कावीळ एक साधारण आजार वाटतो पण जर याचे वेळीस उपचार केले गेले नाही तर हे भयंकर रूप धारण करू शकते. यामध्ये रुग्णाचा जीव देखील जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला या जीवघेण्या आजाराचा घरगुती उपाय सांगत आहोत. जे तुमच्या काविळीला 3-4 दिवसात बरी करेल. हा उपचार कावीळ मग तो हेपेटाइटिस A, B, किंवा C किंवा मग बिलरुबिन, ESR वाढलेले असेल तरीही फायदेशीर राहील.

काविळीपासून सुटका मिळवण्यासाठी सोप्पे घरगुती उपाय

कावीळ हेपेटाइटिस A, B किंवा C यांचा काळ आहे शहाळ (हिरवे नारळ)

रोज दिवसातून कमीतकमी 2 शहाळचे पाणी प्यावे, या नारळाचे ताजे पाणी प्यायचे आहे म्हणजे ते फोडल्यावर लगेच त्याचे पाणी प्यायचे आहे. असे 3-5 दिवस केल्यानंतर तुम्हाला निरोगी झाल्याचा अनुभव येईल. अश्या वेळी रुग्णाला ज्यापण इंग्लिश औषधे दिली जात आहेत, ती बंद करावीत आणि जर रुग्णाची हालत जास्त खराब असेल, तर त्याला ग्लुकोस दिले जाऊ शकते. आणि संपूर्ण दिवस त्याला फक्त नारळ पाणी वरच ठेवा. हा उपाय अनेक रुग्णांना फायदेशीर ठरला आहे. लिवर मध्ये होणाऱ्या कोणत्याही आजारासाठी हा प्रयोग निसंकोच केला जाऊ शकतो.

कांदे: कावीळच्या इलाजामध्ये कांद्याला विशेष महत्व आहे. सर्वात पहिले एक कांदा सोलून त्याचे पातळ-पातळ भाग करून यामध्ये लिंबू पिळणे. त्यानंतर यामध्ये थोडी काळीमिरी पावडर आणि काळेमीठ मिक्स करून दररोज सकाळ-संध्याकाळ सेवन केल्यामुळे कावीळ 15-20 दिवसात संपून जाते.

चण्याची डाळ: रात्री झोपण्या अगोदर थोडी (अर्धीवाटी) चण्याची डाळ भिजत ठेवा. पहाटे उठून भिजलेल्या डाळीचे पाणी काढून त्यामध्ये थोडेसे गुळ मिक्स करा, व घ्या. हा उपाय दररोज एक ते दोन आठवडे केल्यामुळे कावीळ बरी होते. कावीळ बरी करण्यासाठी अजूनही अनेक उपाय आहेत.

सुंठ: सुंठीचा वापर करून देखील कावीळचा उपचार केला जाऊ शकतो. यासाठी सुंठ 10 ग्राम, गुळ 10 ग्राम घ्यावा. ही सामग्री एकत्र करून सकाळी थंड पाण्यासोबत खाण्यामुळे 10 ते 15 दिवसात काविळी पासून सुटका मिळते.

लसून: काविळी मध्ये लसून देखील फायदेशीर आहे. यासाठी कमीतकमी 4 लसून घ्यावे आणि त्यांना सोलून त्यांना बारीक वाटावे त्यामध्ये 200 ग्राम दुध टाकावे. आणि रुग्णाने रोज हे खाण्यामुळे कावीळ मुळा सकट संपून जाते.

चिंच: चिंच रात्री झोपण्या अगोदर पाण्यात भिजत ठेवावी. सकाळी चिंच व्यवस्थित पाण्यात पिळून काढावी आणि या पाण्यात थोडी काळीमिरी पावडर आणि थोडे काळेमीठ मिक्स करून प्यावे. दोन आठवडे हे पिण्यामुळे कावीळ ठीक होते.

मध आणि आवळा रस: एक चमचा मध घ्यावे त्यामध्ये 50 ग्राम ताज्या हिरव्या आवळ्याचा रस मिक्स करून दररोज सकाळी कमीतकमी तीन आठवडे खाण्यामुळे कावीळ पासून सुटका मिळते.

सुकलेले आलू बुखार: 4 सुकलेले आलू बुखार, एक चमचा चिंच आणि एक चमचा खडी साखर, एक ग्लास पाणी यांना एकत्र कोणत्याही मातीच्या भांड्यात भिजत ठेवा. सकाळी या मिश्रणाला हाताने एकत्र करा आणि पाण्याला मलमलच्या कपड्याने गाळून घ्या आणि हे पाणी हळूहळू प्यावे हा उपाय सकाळ संध्याकाळ करावा.

कावीळ झाल्यावर हे पथ्य पाळावीत.

कावीळच्या रुग्णाने मैदा, मिठाई, तळलेले पदार्थ, जास्त मसालेदार, उडद डाळ, खाऊ नये.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

२१ ऑगस्ट ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा होणार; सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला राज्याचा गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनी म्हणजेच २१ ऑगस्ट रोजी राज्यभर 'जलसंधारण…

8 तास ago

मुंबई विद्यापीठाच्या एलएलबी निकालातील घोटाळ्यावर सत्यजीत तांबे आक्रमक

29 विद्यार्थ्यांना शून्य गुण देणाऱ्यांवर कारवाईची मागणी मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या तीन वर्षांच्या एलएलबी अंतिम वर्षाच्या…

8 तास ago

इथेनॉल धोरणावर काँग्रेसचे प्रश्न; वाहनधारकांच्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित इंधन (E20) धोरणावर गंभीर प्रश्न…

8 तास ago

पाण्याचे महत्व

1) शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे. २) दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी पिणे…

8 तास ago

दातांचे दुखणे वाढले, किचनमधील या वस्तूंचा करा वापर

लवंग दातासाठी प्रभावी ठरते. लोंगची पावडर करुन त्यात मीठ मिक्स करा. हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी…

8 तास ago

उत्तम आरोग्य म्हणजे काय

जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने उत्तम आरोग्य म्हणजे फक्त व्याधी, आजार मुक्त शरीरच नव्हे तर शारीरिक,…

8 तास ago