आरोग्य

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी

सफरचंद, बीट, गाजर, थोडं मीठ, आलं आणि लिंबू मिसळून ABC ज्यूस तयार केला जातो. या ज्यूस मध्ये भरपूर जीवनसत्त्वं, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट असतात, जे हिवाळ्यात शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात. हिवाळ्यात शरीराची अतिरिक्त काळजी घ्यावी लागते. तापमानात घट झाल्यामुळे संसर्गासह अनेक आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. तसेच खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. ह्या ज्यूसचा फायदा व्हावा असं वाटत असेल, तर रोज एक ग्लास हा ज्यूस प्यावा. सकाळी उपाशीपोटी हा ज्यूस प्यायल्यास अधिक परिणाम होऊ शकतो. थंडीत ABC ज्यूस पिण्याचे फायदे जाणून घेऊया.

इम्यूनिटी वाढते: या ज्यूस मध्ये व्हिटॅमिन-सी असतं, जे सफरचंद आणि गाजरात आढळतं, ज्यामुळे इम्यूनिटी वाढते. तसेत शरीराला बॅक्टेरिया आणि व्हायरस पासून लढण्यास मदत करतं. हिवाळ्यात सर्दी आणि फ्लू पासून बचाव होतो.

तवाचेची चमक वाढते: हिवाळ्यात त्वचा अनेकदा कोरडी होते. अशा वेळी या ज्यूस मध्ये असलेले व्हिटॅमिन-ए आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेची काळजी घेतात. हे त्वचेला हायड्रेटेड आणि ग्लोइंग ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे हिवाळ्यात चेहरा तजेलदार दिसतो.

पचनक्रिया सुधारते: या ज्यूस मधील गाजर आणि बीट दोन्हीत भरपूर फायबर असतं, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. हा ज्यूस बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर करण्यास आणि आतडे स्वच्छ करण्यास मदत करतो. या ज्यूसमुळे पोट हलकं राहून पचनक्रिया संतुलित राहण्यास मदत होते.

एनर्जी लेव्हल वाढते: हिवाळ्यात, शरीराला अनेकदा थकवा जाणवतो आणि एनर्जी लेव्हल कमी होऊ शकते. या ज्यूस मध्ये साखरेचा नैसर्गिक स्रोत असतो, ज्यामुळे शरीराला त्वरित एनर्जी मिळते. हा ज्यूस शरीर दिवसभर एक्टिव्ह ठेवण्यास मदत करतो.

वजन कमी करण्यास उपयुक्त: ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हा ज्यूस फायदेशीर ठरतो. गाजर आणि बीट सारख्या घटकात कॅलरीज कमी असतात, पण भरपूर फायबर असतात, जे भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. या ज्यूस मुळे मेटाबॉलिज्म वाढतं आणि फॅट बर्न होण्यास मदत होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

12 तास ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

19 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

19 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

19 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

20 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

21 तास ago