आरोग्य

संत्री एक शक्तीवर्धक फळ

१) संत्र हे एक शक्तीवर्धक फळ आहे. संत्र अनेक विकारांवर रामबाण उपाय आहे. संत्र्याचं सेवन केल्यानं सर्दी दूर होते.

२) यासोबत कोरडा खोकला दूर करण्यात देखील संत्री मदत करतं.

३) संत्र हे ओला खोकला असलेल्या कफला पातळ करुन बाहेर काढते.

४) संत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व ‘क’, लोह आणि पोटॅशियम असतं.

५) संत्र्याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यामध्ये फ्रुक्टोज, डेक्स्ट्रोज, खनिज आणि व्हिटॅमिन्स असतात आणि हे शरीराला लगेच ऊर्जा देण्याचे काम करते.

६) संत्र्याचा एक ग्लास रस संपुर्ण शरिराला रिलॅक्स करतो. यामुळं आपला तणाव आणि थकवा दूर होतो.

७) पोट साफ न होण्याची समस्या असेल तर संत्र्याच्या रसामध्ये बकरीचे दूध मिसळुन प्यायल्यास खुप फायदा मिळतो.

८) संत्र्याचे नियमित सेवन केल्याने मूळव्याधाची समस्या दूर होते. रक्तस्राव थांबवण्याची क्षमता यामध्ये आहे.

९) खुप ताप असेल तर रुग्णाला संत्र्याचा रस दिल्याने तापमान कमी होते. यात असलेले सायट्रिक आम्ल हे मूत्र रोग आणि किडनीच्या आजारांना दूर करते.

१०) हृदयरोग असलेल्या लोकांना संत्र्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून दिल्याने आश्चर्यकारक फायदे दिसून येतात.

११) संत्र्याचे नियमित सेवन केल्याने दात आणि हिरड्या चांगल्या राहतात. दात पांढरे होतात आणि तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या दूर होते.

१२) संत्र्यामध्ये अँटीऑक्सीडंट्स अधिक प्रमाणात असतात जे कँसरच्या प्रभावाला नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. कँसरपासुन बचाव करण्यासाठी नियमित संत्र्याचा ज्यूस प्यायल्याने फायदा होतो.

१३) पोटातील गॅस, अपचन, जॉइंट पेन, उच्च रक्तदाब या रोगांसाठी हे रामबाण उपाय आहे.

१४) गरोदर महिला किंवा यकृतचा रोग झालेल्या महिलांसाठी संत्र्याचा ज्यूस खुप फायदेशीर असतो.

१५) गरोदर काळात याचं नियमित सेवन केल्यानं प्रसव वेदनांत आराम मिळतो. यासोबतच बाळाचं आरोग्य खुप चांगलं राहतं.

१६) संत्र्याची साल वाळवून त्याचे चूर्ण तयार करा आणि हे चूर्ण गुलाब जल किंवा दूधात टाकुन चेह-याला लावल्यानं चेहरा स्वच्छ होतो आणि पिंपल्स दूर होतात. ब्लॅकहेड्स आणि सावळेपणा दूर होतो.

१७) संत्र्याचं ताजं फूल बारीक करुन त्याचा रस केसांना लावल्यानं केसांची चमक वाढून केस काळे आणि घनदाट होतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…

15 तास ago

प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…

15 तास ago

‘आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही’! होमगार्डचा आक्रोश; ४० हजार कुटुंबांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…

15 तास ago

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…

15 तास ago

एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…

15 तास ago

काँग्रेसचे ‘पुतना मावशीचे प्रेम’; महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका; डॉ. नीलम गोऱ्हे

महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…

16 तास ago