हल्ली आपण बघतो आहोत की बहुतांश लोकांच्या दातांच्या तक्रारी खूप जास्त वाढल्या आहेत. थंड किंवा गरम पदार्थ खाण्यात आले की लगेचच काही लोकांचे दात ठणकतात. त्यांच्यातून अक्षरश: वेदना होतात आणि त्या स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसून येतात. लहान मुलांनाही हल्ली असाच त्रास बऱ्याच प्रमाणात होत आहे हा त्रास नेमका का होतो, दात सेन्सिटीव्ह होण्यामागची कारणं काय आणि त्यावर काय उपाय करता येऊ शकतो.
थंड, गरम पदार्थ खाताच दातांना ठणक का लागते
1) आपल्या दातांवर एक चमकदार पांढरट थर असतो. ज्याला आपण टूथ इनॅमल असंही म्हणतो. जर काही कारणांनी दातांवरचे इनॅमल कमी झाले तर दात सेन्सिटीव्ह होऊन त्यांना वारंवार ठणक लागते.
2) दातांची योग्य ती काळजी घेतली नाही तर हिरड्या आणि दात यांच्यामध्ये एक सैलसरपणा येऊ लागतो. हा त्रास शक्यतो वयस्कर व्यक्तींना होतो आणि त्यामुळे दातांना ठणक लागते.
3) काही जण ब्रश करताना खूप हार्ड ब्रिसल्स असणारे टुथब्रश वापरतात. गरजेपेक्षा जास्त वेळ आणि जास्त जोर देऊन ब्रश करतात. असं जर वारंवार केलं तर त्यामुळे दातांवरचं इनॅमल कमी होत जातं आणि दात संवेदनशील होतात.
4) काही जण खाण्यापिण्याचे नियम पाळत नाहीत. गरम पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच गार पदार्थ खातात. किंवा थंड पदार्थांनंतर लगेचच गरम पदार्थ खातात. अशा विरुद्ध प्रकृतीच्या पदार्थांचा मारा दातांवर वारंवार झाल्यास दात सेन्सिटीव्ह होतात.
5) दातांचं आरोग्य जपण्यासाठी योग्य आहार घेणं गरजेचं आहे. जर तुमच्या शरीरात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर दात कमजोर आणि संवेदनशील होत जातात.
(सोशल मीडियावरून साभार)
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…