आरोग्य

पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनचा धोका, लहान मुलांची विशेष काळजी घ्या

पावसाळ्यात त्वचाविकारांचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. रुग्णालयांत त्वचाविकारांचे रुग्ण ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. सतत भिजणे, ओलसर कपडे परिधान करणे या विविध कारणांमुळे फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो. हा आजार दुर्लक्षित केला तर तो गंभीर संसर्गाचे रूप धारण करू शकतो. त्वचारोगतज्ज्ञांनी नागरिकांना स्वच्छता आणि त्वचेची योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

पावसाळ्यात खाज, डेंड्रफ टिनिया (रिंगवर्म), बुरशीजन्य दाणे, ॲथलिट्स फूट यासारखे विकार सर्रास आढळून येतात. या विकारांमागे दमट हवामान आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष ही काही कारणे आहेत. पावसात पडणे, घसरणे किंवा सतत ओलसर कपडे वापरण्याने त्वचेवर होणाऱ्या किरकोळ जखमादेखील बुरशीजन्य संसर्गाचे माध्यम बनतात. या जखमांकडे दुर्लक्ष करू नये अन्यथा संसर्ग शरीरभर पसरू शकतो, असे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले.

त्वचारोगांपासून बचाव कसा कराल

खाज येत असल्यास स्वतःहून औषधे न वापरता डॉक्टरांचा सल्ला घ्या. पावसात भिजल्यानंतर त्वचा कोरडी पुसून घ्या.

शक्यतो कॉटनचे आणि सैलसर कपडे वापरा.

ओलसर कपडे किंवा बूट जास्त काळ वापरणे टाळा.

 

पावसाळ्यात त्वचाविकारांत वाढ होते. त्वचेच्या विकारांवर वेळेत उपचार करणे गरजेचे असते. अन्यथा गुंतागुंत निर्माण होऊ शकते. या काळात ३० ते ४० टक्क्यांनी त्वचाविकाराचे रुग्ण वाढत असतात. रुग्णाच्या आजारांची लक्षणे बघून त्यांवर औषधोपचार करण्यात येत असतात.

 

लहान मुलांची विशेष काळजी आवश्यक

 

लहान मुलांची त्वचा नाजूक असल्यामुळे त्यांना त्वचाविकारांची शक्यता अधिक असते. त्यामुळे भिजल्यानंतर कपडे त्वरित बदलणे, त्वचा कोरडी ठेवणे आणि माती किंवा चिखलात खेळताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच घरी आल्यावर अंग स्वच्छ करणे गरजेचे आहे.

 

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

2 मिनिटे ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

1 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

1 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

1 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

1 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

1 तास ago