आरोग्य

पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनचा धोका, लहान मुलांची विशेष काळजी घ्या

पावसाळ्यात त्वचाविकारांचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. रुग्णालयांत त्वचाविकारांचे रुग्ण ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. सतत भिजणे, ओलसर कपडे परिधान करणे या विविध कारणांमुळे फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो. हा आजार दुर्लक्षित केला तर तो गंभीर संसर्गाचे रूप धारण करू शकतो. त्वचारोगतज्ज्ञांनी नागरिकांना स्वच्छता आणि त्वचेची योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

पावसाळ्यात खाज, डेंड्रफ टिनिया (रिंगवर्म), बुरशीजन्य दाणे, ॲथलिट्स फूट यासारखे विकार सर्रास आढळून येतात. या विकारांमागे दमट हवामान आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष ही काही कारणे आहेत. पावसात पडणे, घसरणे किंवा सतत ओलसर कपडे वापरण्याने त्वचेवर होणाऱ्या किरकोळ जखमादेखील बुरशीजन्य संसर्गाचे माध्यम बनतात. या जखमांकडे दुर्लक्ष करू नये अन्यथा संसर्ग शरीरभर पसरू शकतो, असे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले.

त्वचारोगांपासून बचाव कसा कराल

खाज येत असल्यास स्वतःहून औषधे न वापरता डॉक्टरांचा सल्ला घ्या. पावसात भिजल्यानंतर त्वचा कोरडी पुसून घ्या.

शक्यतो कॉटनचे आणि सैलसर कपडे वापरा.

ओलसर कपडे किंवा बूट जास्त काळ वापरणे टाळा.

 

पावसाळ्यात त्वचाविकारांत वाढ होते. त्वचेच्या विकारांवर वेळेत उपचार करणे गरजेचे असते. अन्यथा गुंतागुंत निर्माण होऊ शकते. या काळात ३० ते ४० टक्क्यांनी त्वचाविकाराचे रुग्ण वाढत असतात. रुग्णाच्या आजारांची लक्षणे बघून त्यांवर औषधोपचार करण्यात येत असतात.

 

लहान मुलांची विशेष काळजी आवश्यक

 

लहान मुलांची त्वचा नाजूक असल्यामुळे त्यांना त्वचाविकारांची शक्यता अधिक असते. त्यामुळे भिजल्यानंतर कपडे त्वरित बदलणे, त्वचा कोरडी ठेवणे आणि माती किंवा चिखलात खेळताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच घरी आल्यावर अंग स्वच्छ करणे गरजेचे आहे.

 

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा फायरींग प्रकरणातील दोन मुख्य सराईत आरोपी साताऱ्यातून जेरबंद

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य…

20 मिनिटे ago

जेजुरी पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेली चिमुकली सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन

संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…

2 तास ago

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…

2 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

3 तास ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे तर उपाध्यक्षपदी सुनिल जिते

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

5 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

5 तास ago