आरोग्य

पावसाळ्यात ‘या’ भाज्या खाणं म्हणजे आजारांना आमंत्रण

हीवाळ्यात जसं अन्नपचन खूप चांगलं होतं, खाल्लेलं सगळं अंगी लागतं, तसं पावसाळ्यात होत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पचनक्रिया मंदावलेली असते. त्यामुळे कित्येक पदार्थ पचत नाही. ज्या लोकांना नेहमीच ॲसिडीटी, अपचन असा त्रास होतो, त्यांनी तर त्यांच्या आहाराची पावसाळ्यात थोडी विशेष काळजी घ्यायला हवी. कारण सर्वसामान्य लोकांनाही या दिवसांत कित्येक पदार्थ खाल्ले की पोट जड होणे, ॲसिडीटी, अपचन असा त्रास होतो.

कच्च्या कांद्याप्रमाणेच वांगी खाणंही या दिवसांत कमी करावं. कारण वांगीही वातूळ असतात. त्यामुळेही अनेकांना पोटदुखी, पोट जड पडणे, असे त्रास होतो. या कारणामुळेच आपल्याकडे आषाढी एकादशीपासून जो चातुर्मास पाळतात त्यात कांदा आणि वांगी खाणं बंद केलं जात. या दिवसांत हिरव्या पालेभाज्या खातानाही विशेष काळजी घ्यावी. कारण पालेभाज्यांना चिखल, माती लागलेली असते. त्यात अनेक किटाणू, बॅक्टेरिया असतात. जर भाज्या योग्य पद्धतीने स्वच्छ केल्या नाही तर अपचनाचा त्रास होऊ शकतो.

काकडी, बीट, पत्ताकोबी, गाजर असे पदार्थ एरवी आपण कच्चे खातो. पण पावसाळ्यात ते पचायला जड जातात. त्यामुळे ज्यांना नेहमीच अपचन होते, त्यांनी हे सलाड पावसाळ्यात कधीच कच्चे खाऊ नये. तुपामध्ये थोडेसे फ्राय करून खावे. पावसाळ्याच्या दिवसांत मशरूम खाणेही कमी करावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कल्याण वाहतूक कोंडीवर उपाययोजना, सॅटीस प्रकल्पाला गती; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…

1 दिवस ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसचा भाजपावर हल्ला; चर्चेसाठी नरेंद्र मोदी यांनाही आणा; प्रणिती शिंदे

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…

1 दिवस ago

मी उपमुख्यमंत्री नाही, भूमिपुत्र म्हणून आलो;  एकनाथ शिंदे

सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…

1 दिवस ago

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…

2 दिवस ago

मुंबई युवक काँग्रेसचा SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न; ‘गिग वर्कर्स न्याय अभियान’ पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…

2 दिवस ago

मोदींच्या भाषणावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल; महिला आरक्षणावर भाजपवर ‘इव्हेंटबाजी’चा आरोप

नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…

2 दिवस ago