वातावरण बदल झाला की, लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होतात. सर्दी खोकला होणं तर कॉमनच आहे. पण एक समस्या सगळ्यात जास्त त्रास देते ती म्हणजे कफ. याने छातीत समस्या होते. हिरवा कफ आल्यावर तर लोक आणखीनच घाबरतात. अशात अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी याबाबत एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांनी हिरवा कफ असल्यावर अॅंटी बायोटिक घ्यावं की नाही? याबाबत माहिती दिली आहे.
का होतो हिरवा कफ
आपल्या श्वसननलिकेत जेव्हा एखादं इन्फेक्शन किंवा सूज होते, तेव्हा कफ तयार होतो. सामान्यपणे कफाचा रंग पांढरा किंवा हलका पिवळा असतो. पण जेव्हा इन्फेक्शन जास्त होतं तेव्हा कफ हिरवा आणि घट्ट होतो. हिरवा कफ याचा संकेत देतो की, शरीर इन्फेक्शनसोबत लढण्यासाठी पांढऱ्या रक्तपेशी तयार करत आहे.
हिरवा कफ असल्यावर अॅंटी बायोटिक्स गरजेचे
हिरव्या कफाचा अर्थ नेहमीच बॅक्टेरिअल इन्फेक्शन होत नाही. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की, हिरवा कफ झाल्यावर त्यांना अॅंटी-बायोटिक्सची गरज आहे. पण हा मोठा गैरसमज आहे.
जास्तीत जास्त केसेसमध्ये हिरवा कफ वायरसमुळे होतो. जसे की, सर्दी किंवा फ्लू आणि वायरसवर अॅंटी बायोटिक्सचा काहीच प्रभाव होत नाही. अशात केवळ कफाच्या रंगावरून अॅंटी-बायोटिक्स घेण्याचा निर्णय घेणं योग्य नाही.
कफ दूर करण्याचे उपाय
दिवसभर भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.
आराम करा आणि शरीराला इन्फेक्शनसोबत लढण्यासाठी वेळ द्या.
हलक्या गरम गोष्टी म्हणजे सूप, आल्याचा चहा, तुळशीचा चहा याने कफ पातळ होतो.
रोज सकाळी झोपेतून उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यावे.
(सोशल मीडियावरून साभार)
पुणे: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग (एक्सप्रेसवे) आणि जुना पुणे–मुंबई महामार्ग या…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषदेतील कथित पाईप चोरी प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, या प्रकरणात…
पावसाळ्यात कपडे, शूज आणि वाहन तपासूनच वापरा; विंचू-सापांपासून सावध राहण्याचे आवाहन चंद्रपूर: पावसाळ्यात घरात विंचू,…
किडनी आणि यकृत (लिव्हर) हे शरीराच्या आत असणारे अवयव महत्त्वाची भूमिका बजावतात. शरीरातील अनावश्यक घटक…
आपल्या पायातील शिरा रक्त परत हृदयाकडे नेतात. कधी कधी या शिरांमधील झडपा नीट काम करत…
मुंबई: मुंबईसह राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घडलेल्या दुर्घटनांमध्ये निष्पाप नागरिकांचा मृत्यू होत असल्याबद्दल काँग्रेसचे…