महाराष्ट्र

मुंबईतील पावसाळी दुर्घटनांवर सरकारला धारेवर; जबाबदारांवर कारवाईची विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई: मुंबईसह राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घडलेल्या दुर्घटनांमध्ये निष्पाप नागरिकांचा मृत्यू होत असल्याबद्दल काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत तीव्र चिंता व्यक्त केली. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या दुर्घटना घडल्याचा आरोप करत त्यांनी उच्चस्तरीय चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, मुंबईत मॅनहोलमध्ये पडणे, झाड कोसळणे तसेच मानखुर्द येथील इमारत दुर्घटनेत गेल्या दोन दिवसांत १२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे प्रशासनाची पूर्वतयारी आणि आपत्ती व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण, झाडांची छाटणी, मॅनहोलची सुरक्षितता, जलनिस्सारण व्यवस्था आणि आपत्कालीन नियोजन प्रभावीपणे झाले असते, तर अनेकांचे प्राण वाचले असते, असे त्यांनी नमूद केले.

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्याने द्रुतगती मार्ग, जुना मुंबई–पुणे महामार्ग आणि घाट विभागातील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून हजारो प्रवासी अडकून पडल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीही या प्रकल्पात खड्ड्यांचा प्रश्न उपस्थित झाला होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

राज्य सरकारने संपूर्ण परिस्थितीबाबत तातडीने अधिकृत निवेदन करून नागरिकांना वस्तुस्थिती, उपाययोजना आणि पुढील नियोजनाची माहिती द्यावी. तसेच सर्व दुर्घटनांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी व यंत्रणांची जबाबदारी निश्चित करत दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना महामार्ग बंद; नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

पुणे: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग (एक्सप्रेसवे) आणि जुना पुणे–मुंबई महामार्ग या…

2 तास ago

‘पाईप चोरी’ प्रकरणात फिर्यादी व स्वच्छता निरीक्षकांची चौकशी करा; अनिल बांडे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषदेतील कथित पाईप चोरी प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, या प्रकरणात…

2 तास ago

पँटमध्ये लपलेल्या विंचवाचा 12 वर्षीय मुलाला दंश; डॉक्टरांच्या प्रयत्नांनी 72 तासांनंतर जीव वाचला

पावसाळ्यात कपडे, शूज आणि वाहन तपासूनच वापरा; विंचू-सापांपासून सावध राहण्याचे आवाहन  चंद्रपूर: पावसाळ्यात घरात विंचू,…

2 तास ago

हिरवा कफ झाल्यावर अ‍ॅंटी बायोटिक्स घ्यावे की नाही

वातावरण बदल झाला की, लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होतात. सर्दी खोकला होणं तर कॉमनच आहे.…

2 तास ago

किडनी, लिव्हर साठी डीटॉक्स ड्रिंकचे फायदे

किडनी आणि यकृत (लिव्हर) हे शरीराच्या आत असणारे अवयव महत्त्वाची भूमिका बजावतात. शरीरातील अनावश्यक घटक…

2 तास ago

व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय

आपल्या पायातील शिरा रक्त परत हृदयाकडे नेतात. कधी कधी या शिरांमधील झडपा नीट काम करत…

2 तास ago