वेळेला चहा सर्वांनाच लागतो. चहाशिवाय काहींची सकाळही होत नाही. नियमित चहा प्यायल्याने काहींना दिवसभर फ्रेश वाटते. चहा करण्याची पद्धत प्रत्येकाची सारखीच असेल असे नाही. काही जण त्यात चहा मसाला, आलं घालतात. पण चहामध्ये कोणते पदार्थ घालू नये. याची माहिती आपल्याला आहे का.
चहा किंवा पोळी आपण नियमित खातो. पण त्यात कोणत्या गोष्टी घालू नये. अनेकदा नकळत आपण पदार्थात गोष्टी घालतो, यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. चहा आणि कणकेत कोणत्या गोष्टी घालू नये. पाहूयात
आयुर्वेदानुसार चहामध्ये अनेक घटक असतात. जे शरीरात विषासारखे कार्य करतात. याशिवाय चहामध्ये आपण अनेक गोष्टी घालतो. ज्यामुळे चहामध्ये असलेले पौष्टीक घटक नष्ट होत जाते.
चहामध्ये काय घालू नये
चहामध्ये दूध आणि साखर घातलीच जाते. त्याशिवाय चहा अपूर्ण आहे. पण चहामध्ये दूध आणि साखरेचं मिश्रण घालणं योग्य नाही. शिवाय साखर खाण्याचे काही दुष्परिणाम असल्यामुळे त्यात काही जण गुळ घालतात. पण यामुळे खराब पचन आणि मधुमेहाचा धोका वाढतो. चहासोबत नमकीन, समोसे किंवा चाट-पकोडी कधीही खाऊ नये.
कणकेत काय घालू नये
चपाती आणि पराठ्याची चव वाढवण्यासाठी कणिक मळताना अनेक जण मीठ घालतात. मिठामुळे चपाती किंवा पराठ्याची चव वाढते. पण तज्ज्ञांच्या मते असे करू नये. कणकेत मीठ घालून पराठा कधीही करू नये. तसेच पॅकबंद पिठापासून बनवलेल्या पोळ्या बनवून खाऊ नका.
कोणत्या गोष्टी एकत्र खाऊ नये
हरभरा, गूळ, केळी आणि दूध कधीही एकत्र खाऊ नये. अनेकजण चण्यासोबत गुळ, केळी आणि दूध घालून शेक तयार करतात. जे आरोग्याच्यादृष्टीने अत्यंत धोकादायक मानले जाते. यामुळे पोटाचे विकार वाढतात.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…