आरोग्य

पचनशक्ती वाढवण्याचे साधे आणि सरळ उपाय

(1) सकाळी उठल्यावर नुसता चहा घेऊ नये।त्या सोबत तुमची जी काही न्याहारी असेल ती सोबत खाऊन मगच चहा घ्यावा।

(2) दुपारचे जेवण आणि न्याहारी यात किमान ४ तासांचे अंतर असावे.मध्ये काहीही खाऊ नये

(3) दुपारचे भोजन झाल्यावर ज्यांना शक्य असेल त्यांनी डाव्या कुशीवर २० मिनिट झोपावे।

(4)  सर्वात महत्त्वाचे, जे जेवताना थोडे थोडे पाणी पिणे चालेल,परंतु एकदा जेवण झाले की फक्त घसा ओला करण्यासाठी अगदी एक घोट पाणी घ्यावे। मग मात्र कमीत कमी ४०मिनीट आणि जास्तीतजास्त १तास पाणी पिऊ नये।कारण मग पचनासाठी लागणारा अग्नि विझून जातो,आणि अन्न पचन होत नाही।म्हणजे बघा पेटलेल्या अग्नीवर जर आपण एकदम पाणी ओतले तर कसा क्षणार्धात अग्नी विझतो तसेच आपल्या पोटात होते,वागभट्टांंनी म्हटले आहे की ‘भोजनांंते विषमवारी’ म्हणजे भोजन झाल्यावर पाणी पिणे विषसमान असते.मगअन्न पचनासाठी लागणारी उष्णता पोटाला न मिळाल्याने अन्न कुजते आणि पचन न झालेल्या अन्नाचे रस तसेच रक्तात मिसळून अनेक व्याधी निर्माण होतात।

(5)संध्याकाळी काहीतरी म्हणजेच ४तास झाल्यानंतर काहीतरी पोहे उपमा असे काहीतरी खाणे नाहीतर दुपारचे जेवण ४तासात पचवून पित्त घशाशी यायला सुरुवात होते।आणि आपल्याला वाटते की आपल्याला आम्लपित्त झाले आहे,आणि मग आपण उगाच आम्लपित्तावर औषधे घेत राहतो।एकदा दुपारचे जेवण होऊन ४तास झाले की काही ना काही खाणे आवश्यक आहे।

(6)रात्रीचे जेवण झाल्यानंतर सुद्धा लगेच पाणी न पिता ४०मिनिटे थांबून पाणी प्यावे,वर सांगितल्या प्रमाणे। तुम्ही जेवण झाल्यानंतर ताक प्यालात तर ते मात्र फायदेशीर असते। ते तुम्ही पिऊ शकतात।असे जर जेवणानंतर नियम कायम पाळलेत तर अन्न पचन उत्तम होते। मी स्वतः वरील नियम पाळतो। त्यामुळे मला कित्येक वर्षे आम्लपित्ताचा त्रास कधीच होत नाही।आणि खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होऊन अंगी लागते।आणि शरीर निरोगी राहते

५० वया नंतर, प्रक्रिया केलेले पदार्थ, जास्त साखर आणि मीठ असलेले पदार्थ, तळलेले पदार्थ, जंक फूड आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ टाळावेत, कारण पचनसंस्था कमकुवत होते आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो, त्याऐवजी फायबर, प्रथिने आणि ताजी फळे-भाज्या खाणे फायदेशीर ठरते.

काय खाऊ नये (50 नंतर):

प्रक्रिया केलेले अन्न: पॅकेज केलेले स्नॅक्स, तयार जेवण, बेकरी उत्पादने ज्यात प्रिझर्व्हेटिव्ह आणि अनावश्यक कॅलरी असतात.

जास्त साखर आणि मीठ असलेले पदार्थ: शीतपेये, मिठाई, प्रक्रिया केलेले सॉस, लोणची

तळलेले पदार्थ: पचायला जड आणि कोलेस्ट्रॉल वाढवणारे.

जंक फूड: बर्गर, पिझ्झा, चिप्स यांसारख्या पदार्थांमुळे वजन वाढते आणि आरोग्य बिघडते.

लाल मांस: जास्त प्रमाणात खाल्ल्यास आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

अल्कोहोल आणि जास्त कॅफिन: शरीराला डिहायड्रेट करू शकते.

काय खावे (50 नंतर): फायबरयुक्त पदार्थ: पालेभाज्या, फळे (सफरचंद, पेरू), ओट्स, डाळी, कडधान्ये.

प्रथिनेयुक्त पदार्थ: मासे, अंडी, डाळी, सोयाबीन स्नायूंच्या ताकदीसाठी महत्त्वाचे.

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी: हाडांच्या बळकटीसाठी दुग्धजन्य पदार्थ (दही, दूध).

पाणी: भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

8 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

8 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

8 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

10 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

22 तास ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

22 तास ago