शरीराला नैसर्गिक शक्ती असते स्वतः आजारावर मात करण्याची. आपण जीवनशैली योग्य ठेवली, तर अनेक आजार होण्यापूर्वी टाळता येतात.
1) आहार सुधारणा
ऋतु आणि प्रदेशानुसार ताजे, स्थानिक व हलके पचणारे अन्न खावे.
भाजीपाला, फळे, डाळी, संपूर्ण धान्य, मोड आलेली कडधान्ये यांचा वापर वाढवावा.
जास्त तेलकट, मसालेदार, पॅकबंद व फास्टफूड टाळावे.
पाणी शुद्ध व कोमट स्वरूपात पिणे चांगले.
2) शारीरिक शुद्धी
योगासने व प्राणायाम: शरीरातील रक्ताभिसरण, श्वसन व पचन सुधारतात.
सूर्यनमस्कार: सर्वांग व्यायाम, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.
नियमित चालणे, धावणे, सायकलिंग इ. करून शरीर सक्रिय ठेवावे.
3) मानसिक संतुलन
ध्यान, प्राणायाम, सकारात्मक विचार मनशांतीसाठी उपयोगी.
जास्त राग, ताण, चिंता टाळाव्यात.
पुरेशी झोप घेणे (७-८ तास) आवश्यक.
4) निसर्गोपचार
सूर्यस्नान: शरीरातील जीवनसत्त्व D मिळते.
पादस्नान, वाफारा, थंड पाण्याचे शेक: रक्ताभिसरण सुधारते.
माती व पाण्याचे उपचार: शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतात.
५) रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी
हळद, आलं, लसूण, तुळस, दालचिनी, जिरे यांचा आहारात वापर.
आंबट पदार्थांमध्ये (आवळा, लिंबू) जीवनसत्त्व C मिळते.
मध्यम प्रमाणात उपवास करून पचनशक्ती वाढवणे.
(सोशल मीडियावरून साभार)
पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…
सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…
बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…
सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…
नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…