शरीराला नैसर्गिक शक्ती असते स्वतः आजारावर मात करण्याची. आपण जीवनशैली योग्य ठेवली, तर अनेक आजार होण्यापूर्वी टाळता येतात.
1) आहार सुधारणा
ऋतु आणि प्रदेशानुसार ताजे, स्थानिक व हलके पचणारे अन्न खावे.
भाजीपाला, फळे, डाळी, संपूर्ण धान्य, मोड आलेली कडधान्ये यांचा वापर वाढवावा.
जास्त तेलकट, मसालेदार, पॅकबंद व फास्टफूड टाळावे.
पाणी शुद्ध व कोमट स्वरूपात पिणे चांगले.
2) शारीरिक शुद्धी
योगासने व प्राणायाम: शरीरातील रक्ताभिसरण, श्वसन व पचन सुधारतात.
सूर्यनमस्कार: सर्वांग व्यायाम, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.
नियमित चालणे, धावणे, सायकलिंग इ. करून शरीर सक्रिय ठेवावे.
3) मानसिक संतुलन
ध्यान, प्राणायाम, सकारात्मक विचार मनशांतीसाठी उपयोगी.
जास्त राग, ताण, चिंता टाळाव्यात.
पुरेशी झोप घेणे (७-८ तास) आवश्यक.
4) निसर्गोपचार
सूर्यस्नान: शरीरातील जीवनसत्त्व D मिळते.
पादस्नान, वाफारा, थंड पाण्याचे शेक: रक्ताभिसरण सुधारते.
माती व पाण्याचे उपचार: शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतात.
५) रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी
हळद, आलं, लसूण, तुळस, दालचिनी, जिरे यांचा आहारात वापर.
आंबट पदार्थांमध्ये (आवळा, लिंबू) जीवनसत्त्व C मिळते.
मध्यम प्रमाणात उपवास करून पचनशक्ती वाढवणे.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…
मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…
मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…
नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…